नेवासा शहरातील जळीतग्रस्त दुकानदारांचे नगरपंचायतींच्या गाळ्यात तात्पुरत्या स्वरुपात पुर्नवसन करा- राधाकृष्ण विखे पाटलांचे तहसिलदारांना आदेश

नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा शहरात शॉर्टसर्किट’ने लागलेल्या आगीत बारा दुकाने जळून खाक झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी मध्यराञीच्या सुमारास घडलेली असून या दुर्घटनेत सुमारे एक कोटी पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल खात्याने केलेल्या पंचनामा अहवालात केलेला आहे. रविवार (दि.२८) रोजी राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंञी राधाकृष्ण विखे – पाटील यांनी नेवासा शहरातील नुकसानग्रस्त जळीत झालेल्या दुकानांची पाहणी केली व या जळीत झालेल्या दुकाणदारांना शासनाची जास्तीत जास्त अर्थिक मदत मिळवून देण्यासाठी महसूल विभागाला पंचनामे करण्याचा आदेश पालकमंञी विखे – पाटील यांनी यावेळी दिला. जळीत झालेल्या नुकसानीमुळे दुकानदारांचा उघड्यावर पडलेला संसार पुन्हा एकदा उभा राहण्यासाठी नेवासा नगरपंचायतीने बांधलेल्या गाळ्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात जळीतग्रस्त व्यापाऱ्यांना गाळे खुले करुन देण्याचा आदेश पालकमंञी विखे – पाटील यांनी नेवासा तहसिलदार डॉ.संजय बिरादार यांना दिला व तातडीने सोमवारी बैठक घेवून मार्ग काढण्याचा आदेशही यावेळी विखे – पाटील यांनी दिल्यामुळे नुकसानग्रस्त दुकानदारांना आधार मिळाला असल्याचे भाजप – सेना महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.
यावेळी ना.विखे – पाटील यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे – पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर,नेवासा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,डॉ.करणसिंह घुले, ऋषिकेश शेटे,सचिन देसर्डा,डॉ.बाळासाहेब कोलते, शिवसेना नेते भाऊसाहेब वाघ, ॲड.के.एच.वाखुरे, माजी नगरसेवक सुनिल वाघ,राजेंद्र मुथ्था,बाळासाहेब भदगले, प्रतिक शेजुळ,गफ्फुरभाई बागवान,प्रकाश निपुंगे, बाळासाहेब क्षिरसागर यांच्यासह भाजप – सेना व महायुतीचे पदाधिकारी व नुकसानग्रस्त व्यापारी तसेच नागरीक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नेवासा शहरातील व्यापारी व नागरीकांनी नेेवासा नगरपंचायत कार्यालयाकडे अग्नीशमन बंब नसल्यामुुळेेच नगरपंचायत चौकात असलेल्या बारा दुकानांना आग लागून एक कोटी पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याच्या दुर्घटनेची कैफियत ना.विखे – पाटील यांच्या समोर मांडली असता ना.विखे – पाटील यांनी आ.गडाख यांचे नाव न घेता त्यासाठीच आपला लोकप्रतिनिधी सक्षम असला पाहीजे अशी टिका यावेळी नेवासकरांसमोर बोलताना केली.
नेवासा शहरातील जळीत झालेल्या दुकानदारांचा संसार उघड्यावर येवून पडलेला असतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी शनिवारी या जळीत दुर्घटनेची पाहणी करुन ना.विखे – पाटील यांना या दुर्घटनेची माहीती दिली असता ना.विखे – पाटील रविवारी नेवासा शहरात दाखल झाले नुकसानीची पाहणी केली आणि व्यापाऱ्यांना नगरपंचायतीने बांधलेल्या गाळ्यात तात्पुरत्या स्वरुपात आधार देण्याचा आदेश नेवासा तहसिलदार बिरादार यांना देवून सोमवारी तातडीची बैठक घेवून मार्ग काढण्याचा आदेश दिल्यामुळे ना.विखे – पाटील यांच्या दौऱ्यामुळे नकसानग्रस्त व्यापाऱ्यांना मोठा आधार मिळाला असल्याचे नेवासकरांतून बोलले जात आहे. यावेळी धनंजय डहाळे,प्रकाश निपुंगे,मनोज पारखे,रोहित पवार,अदिनाथ पटारे,सतिश गायके,किशोर गारुळे, ॲड.संजीव शिंदे,स्वप्निल मापारी,नाविद दारुवाला यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी नागरिक व व्यापारी यावेळी उपस्थित होते.
नेवासा नगरपंचायतीकडे अग्नीशमन बंब नसल्यामुळेच नगरपंचायत चौकात बारा दुकानांना आग लागून मोठी नुकसान झाल्याची कैफियत ना.विखे – पाटील यांच्याकडे नागरीकांनी केली असता ना.विखे – पाटील यांनी आ.शंकरराव गडाख यांचे नाव न घेता त्यासाठीच आपला लोकप्रतिनिधी सक्षम असला पाहीजे अशी टिका यावेळी ना.विखे यांनी आ.गडाख यांच्यावर नाव न घेता केली.





