कळंब (ता. आंबेगाव): येथे घोड नदीपात्रात दीप प्रज्वलन करून महिलांनी दिवे पाण्यात सोडले.
मंचर – काकड आरती समाप्ती, कार्तिकी स्नान सोहळा आणि त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, तसेच अन्नदानाचाही लाभ हजारो भाविकांनी घेतला. मंचर, घोडेगाव, निरगुडसर, अवसरी पिंपळगाव, कळंब, वर्पेमळा, लौकी चांडोली, एकलहरे, नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, महाळुंगे ,साकोरे, चास आदी गावांमध्ये काकड आरती समाप्ती सोहळा पारंपरिक पद्धतीने टाळ मृदंगाच्या गजरात, संत ज्ञानोबा तुकाराम यांचा गजर करत गावातून प्रभात फेरी काढून साजरा करण्यात आला.
कळंब येथील अदिशक्ती कमलजदेवी मंदिरात गेल्या ३५ वर्षांपासून स्व. हभप केशव महाराज कबीर यांच्या प्रेरणेने काकड आरती सोहळा सुरू करण्यात आला . काकड आरती सोहळा गेल्या दीड महिन्यापासून हभप सुरेखा रामदास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अभंग, गवळणी आणि ज्ञानोबा-तुकाराम महाराज यांच्या ओव्या गाऊन जमलेल्या ग्रामस्थांच्या आणि दररोज काकड आरतीत सहभागी असणाऱ्या सर्व महिला, जेष्ठ नागरिक व लहान मुले यांच्या उपस्थितीमध्ये देवीची आरती करून प्रभात फेरी सोहळ्यास सुरुवात झाली. आदिशक्ती कमलजादेवी मंदिरापासून ते कळंब ग्रामपंचायत चौकात प्रभात फेरी काढून ज्ञानोबा-तुकाराम यांचा गजरात काढण्यात आली.
पवित्र घोडनदी पात्रात दीप प्रज्वलन करून नदीपात्रात दिवे विसर्जित करण्यात आले. काकड आरती सोहळा समाप्तीवेळी सरपंच उषा कानडे, ग्रामपंचायत सदस्या गुलाबबाई कानडे, माजी ग्रामपंचायत सदस्या सविता भालेराव, शिक्षिका सीमा कहडणे, मंगल थोरात, मंगल कानडे, सुलोचना कानडे, अंजनी कानडे, माजी सरपंच गंगाधर कानडे, यशवंत कानडे, तुकाराम कानडे, बाबुराव कानडे, शांताराम थोरात ,रामदास शिंदे, हभप प्रशांत गुरव, हभप गेनभाऊ गारगोटे, हभप महादू भालेराव, नितीन पवार, अरुण रामकर, मंदाकिनी पवार, सुनंदा कहडणे, विजया भालेराव, संध्या कानडे, सुमन कहडणे यांसह काकड आरती प्रसंगी दररोज उपस्थित असणाऱ्या महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, ग्रामस्थ, आजी-माजी पदाधिकारी सहभागी झाले होते. हभप सुरेखा शिंदे आणि हभप गेणभाऊ गारगोटे यांचा ग्रामस्थांच्या वतीने भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक यशवंत कानडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.