‘सीबीआयने कंगना राणावतला अटक करावी’ ; प्रियांका चतुर्वेदी यांनी केली मोठी मागणी

Priyanka Chaturvedi on Kangana Ranaut । शेतकरी आंदोलनात बलात्कार आणि हत्येबाबत बोलणाऱ्या भाजप खासदार कंगना राणावतवर विरोधक पूर्णपणे हल्लाबोल करत आहेत. कंगना राणावतने शेतकऱ्यांची आणि संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेससोबतच शिवसेना आणि ठाकरे गटाकडूनही सातत्याने होत आहे. त्याचवेळी उद्धव गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही सीबीआयने कंगना राणावतला अटक करावी, असे म्हटले आहे.
एका हिंदी वृत्तपत्राशी बोलताना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी कंगना राणावतवर निशाणा साधत आता खासदार झाल्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करून समजून घ्यायला हवे, असे त्यांनी म्हटले. तसेच एका खासदाराने असे बेजबाबदार विधान करावे, हे आश्चर्यकारक आहे” असेही त्यांनी म्हटले. प्रियांका चतुर्वेदी यांनी विचारले, ‘बलात्कार हा इतका हलका शब्द आहे का की कंगना राणावत देशातील शेतकऱ्यांना बलात्कारी म्हणतेय? कंगना राणावतकडे अशी माहिती आहे का जी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे नाही?
‘सीबीआयने कंगना राणावतला अटक करावी’ Priyanka Chaturvedi on Kangana Ranaut ।
इतकेच नाही तर प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, “सीबीआयने कंगना राणावतला ताबडतोब अटक करावी, जेणेकरून तिची चौकशी करून कळेल की जर भाजप खासदाराकडे एवढी माहिती होती, तर ती गृहमंत्रालयाला का दिली नाही?” असे म्हणत टीका केली.
मोठा हल्ला करताना प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, कंगना राणावत या भ्रमात आहे की ती जगातील सर्वात जाणकार महिला आहे. त्यांना वाटते की त्यांच्याकडे सर्व माहिती आहे. चित्रपटसृष्टीतील राजकारण फक्त त्यांनाच माहीत होते. सुशांत सिंग राजपूतने काय केले हे फक्त तिलाच माहीत होते. खासदार म्हणाल्या की, कंगना राणावतला अक्कल हवी आहे.
‘शेतकरी आंदोलनात बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवली असती’ Priyanka Chaturvedi on Kangana Ranaut ।
काही काळापूर्वी कंगना राणावतने दावा केला होता की, शेतकरी आंदोलनात बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवू शकते. शेतकरी आंदोलनात बदमाश लोक हिंसाचार पसरवत असल्याचा दावा त्यांनी केला. तिथे बलात्कार आणि खून व्हायचे. शेतकऱ्यांची बिले काढली नसती तर हे बदमाश देशात काहीही करू शकले असते.
हेही वाचा
‘मी खलिस्तानी आणि पाकिस्तानीसुद्धा …’ ; फारुख अब्दुल्ला असे का म्हणाले?





