Pratap Sarnaik : धाराशिवमध्ये भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
जिल्ह्यातील भटक्या श्वानांची समस्या सोडवण्यासाठी आणि भटके व पाळीव प्राणी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करण्यासाठी हा निर्णय (Pratap Sarnaik) घेण्यात आला आहे.

Pratap Sarnaik : धाराशिव जिल्ह्यातील आठ नगर परिषदा आणि दोन नगर पंचायतींमध्ये भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे आणि प्राण्यांसाठी अंत्यसंस्कार स्थळे उभारण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. परिवहन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे.
या प्रकल्पासाठी २३.१४ कोटी रुपये खर्च येणार असून, यासाठीचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत खर्च केला जाईल. जिल्ह्यातील भटक्या श्वानांची समस्या सोडवण्यासाठी आणि भटके व पाळीव प्राणी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करण्यासाठी हा निर्णय (Pratap Sarnaik) घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, मुरूम, कळंब, भूम आणि परांडा अशा आठ नगर परिषदा आहेत, तर वाशी आणि लोहारा (बुद्रुक) येथे दोन नगर पंचायती आहेत. स्थानिक प्रशासनाकडून या प्रकल्पांसाठी आवश्यक जमिनी निश्चित करण्यात आल्या आहेत; मात्र मुरूम, वाशी, कळंब आणि लोहारा येथील जमिनी निश्चितीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे.
धाराशिवमध्ये मोठ्या आणि लहान प्राण्यांसाठी दोन स्वतंत्र सुविधा उभारल्या जातील, तसेच जिल्ह्यातील सर्व १० स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये श्वानांसाठी निवारा केंद्रे स्थापन (Pratap Sarnaik) केली जातील.






