“…तर विधानसभेला ‘वंचित’ला निवडून द्या” ; जातीय आरक्षणाचा मुद्दा उचलत प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन

Prakash Ambedkar । देशात जातनिहाय आरक्षणावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिकलेल्या वर्गाला मग तो डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, वकील किंवा खासगी कंपनीत काम करणारा असेल यातील ज्यांनी लाभ घेतला आहे त्यांना आरक्षण या पुढे मिळणार नाही. या मताचे आपण आहात का ? नसाल, तर या निवडणुकीत जोरदारपणे मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मत द्या, असे आवाहन आहे.
न्यायालयाच्या निर्णयाला ते महत्व देत नाहीत Prakash Ambedkar ।
सर्वोच्च न्यायालयाने एससी, एसटी यांच्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय देताना एससी आणि एसटीमध्ये वर्गीकरण झाले पाहिजे आणि त्याच सोबत क्रिमीलेयर हे तत्त्व सुद्धा लागू झाले पाहिजे. असा तो निर्णय आहे. या निर्णयाच्या संदर्भात मी आयएएस अधिकाऱ्यांशी बोललो, खासगी कंपनीत उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींशी बोललो. या दोन्ही वर्गाला क्रिमीलेयर कळलं नाही. त्यामुळे ते या निर्णयाला महत्व देत नसल्याचे आंबेडकरांनी म्हटले.
पुढे बोलताना आंबेडकर यांनी,”सुप्रीम कोर्टाने क्रिमीलेयर ठरवताना त्यांनी क्रिमिलेयरची व्याख्या केली. ही व्याख्या करत असताना कोर्टाने असे म्हटले आहे की, एखादे अनुसूचित जाती किंवा जमाती मधील कुटुंब यांनी आरक्षणाचा लाभ घेतला असेल, तर यानंतर त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. याचाच अर्थ आपण आरक्षणाचे लाभार्थी असाल तर आपले कुटुंब आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार नाही. हा निर्णय कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत भारतीय जनता पक्षाने केले आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा केले आहे. काँग्रेसशासित दोन राज्यांत अंमलबजावणी करण्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली आहे” असे म्हटले.
वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला मतदान द्या Prakash Ambedkar ।
दरम्यान, फुले, शाहू, आंबेडकरी जनतेला हा निर्णय मान्य आहे का ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, ज्या राजकीय पक्षाला आपण लोकसभेत मतदान केले. ज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) असेल या सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे आरक्षण थेट संपत नसल्याने क्रिमीलेयरच्या माध्यमातून संपवण्याचे काम सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने अगोदरच या निर्णयाला विरोध केला आहे. आपणही विरोध करणार असाल तर येणाऱ्या विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला मतदान द्या, असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी केले.





