Political News : शिवसेनेत उभी फूट; 38 पदाधिकाऱ्यांचा शिंदेंना जय महाराष्ट्र!
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने अनेक जागांवर बिनविरोध विजय मिळवत (Political News) महाविकास आघाडीला बॅकफूटवर ढकलले असले, तरी रायगडमध्ये मात्र महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

Political News : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने अनेक जागांवर बिनविरोध विजय मिळवत (Political News) महाविकास आघाडीला बॅकफूटवर ढकलले असले, तरी रायगडमध्ये मात्र महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
रायगड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली खरी; मात्र या निवडीमुळे रायगडमधील (Political News) शिवसैनिकांमध्ये (शिंदे गट) प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या नाराजीतूनच शिवसेनेला पहिला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या ३८ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.
जागा राष्ट्रवादीला गेल्याने शिवसैनिक आक्रमक
रायगडच्या या जागेसाठी महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सुरुवातीपासूनच जोरदार रस्सीखेच सुरू होती. स्थानिक पातळीवर ही जागा शिवसेनेला सुटावी, अशी शिवसैनिकांची आग्रही मागणी होती. मात्र, वरिष्ठ पातळीवरील वाटाघाटीत ही जागा राष्ट्रवादीच्या पदरात पडली.
जागा राष्ट्रवादीला सुटल्याच्या बदल्यात शिवसेनेला रायगडचे पालकमंत्रिपद दिले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात असली, तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे समाधान झालेले नाही.आमदार महेंद्र थोरवे यांनी या निवडणुकीत अनिकेत तटकरे यांना उघड सहकार्य केल्यामुळे शिवसैनिकांमधील नाराजी आणखी वाढली आणि त्याचे पर्यावसान अखेर राजीनामा सत्रात झाले.
“औरंगजेबाच्या तहात आम्ही पराभूत झालो…” शिवसैनिकांचा संताप
खालापूरचे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगडमधील तब्बल ३८ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. राजीनामा दिल्यानंतर संदेश पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि बोचरी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले “आम्हाला असं वाटतंय की औरंगजेबाच्या सुतारवाडीच्या तहात आम्ही पराभूत झालो. हे आम्हाला केवळ डिवचण्याचं काम सुरू आहे. मी स्वतः तालुकाप्रमुख पदावर होतो, पण सत्तेत असूनही मी या पदाचा राजीनामा दिला आहे. जिथे आमची नाचक्की होईल, असली सत्ता आम्हाला नको आहे!”
आता पालकमंत्रिपद आणि भरत गोगावलेंकडे लक्ष!
रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आमदारकी मिळाल्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून पालकमंत्रिपदासाठी दबाव वाढणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या गळ्यात रायगडच्या (Political News) पालकमंत्रिपदाची माळ कधी पडणार? आणि मुख्यमंत्र्यांकडून ही नाराजी दूर करण्यासाठी काय पावले उचलली जाणार? याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






