पिंपरी – ‘कवी समाजात बदल घडविण्याचे काम करतो. त्याने त्याचे अस्तित्व काम ठेवले पाहिजे. समाजामध्ये सकारात्मक विचार वाढविण्यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने आयोजित शहाण्णव कवितांच्या संग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी मोरे बोलत होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते, ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, राजन लाखे, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार आदी उपस्थित होते.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, या कविता संग्रहाच्या माध्यमातून कवितेला एक वेगळ व्यासपीठ मिळाले आहे. यामुळे कवींना कविता लेखन करण्याचा उत्साह नक्कीच वाढला आहे. या काव्यसंग्रहात चित्रकाराने चित्राबरोबर सुलेखनच्या माध्यमांतून कवितेला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. आजच्या या कविता संग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमातून साहित्यिकांच्या विचारांचे विचारमंथन झाले.
– डॉ. श्रीपाल सबनीस, प्रदीप दाते यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष घुले यांनी सूत्रसंचालन केले.