पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर पीएमपी कर्मचार्यांनी पीएमपीच्या ग्राहक पतसंस्था मधून घेतलेल्या कर्जाचे हप्ते पगारातून कपात करू नयेत, तसेच, कर्मचार्याना लागलेल्या दंडाची सद्यस्थितीत कपात करू नये, अशी मागणी पीएमपी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेने केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीचे केवळ पाच टक्के कर्मचारी कामावर हजर आहेत. याचबरोबर, कर्मचाऱ्यांच्या वेतनास विलंब झाला आहे. तसेच, आतापर्यंत बहुताश कर्मचाऱ्यांनी पीएमपीच्या ग्राहक भांडार मधून कर्ज घेतलेले आहे. तसेच, कामावर असताना काही कर्मचार्यांना हलगर्जीपणामुळे दंडही झाला आहे. ही रक्कम सदर कर्मचार्यांच्या पगारातून दर महिन्याला कपात केली जाते. मात्र, करोनामुळे तीन महिने पीएमपी कर्मचार्यांना सुट द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.