आयुष्यात सर्वात जास्त आनंदी झाल्यावर पीएम मोदी पहिला फोन कोणाला करतील? जाणून घ्या हृदयस्पर्शी उत्तर

PM Modi Phone Call: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पहिल्यांदाच पॉडकास्टमध्ये दिसले. झेरोधा चे सह-संस्थापक निखिल कामत यांनी पॉडकास्टमध्ये पंतप्रधानांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा ध्वज फडकवण्याच्या घटनेचा उल्लेख केला. त्यानंतर लगेचच आईशी फोनवर बोलल्याचेही त्यांनी सांगितले.
An enjoyable conversation with @nikhilkamathcio, covering various subjects. Do watch… https://t.co/5Q2RltbnRW
— Narendra Modi (@narendramodi) January 10, 2025
कामत यांनी विचारले की, उद्या तुमच्या आयुष्यात अशी घटना घडली, ज्यामुळे तुम्हाला सर्वाधिक आनंद होईल, तर पहिला फोन कोणाला कराल? यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘जेव्हा मी श्रीनगरच्या लाल चौकात गेलो होतो. तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी गेलो होते. (त्यावेळी) पंजाबमधील फगवाडाजवळ आमच्या (एकता) मोर्चावर हल्ला झाला, पाच-सहा लोक मारले गेले. अनेक जण जखमी झाले. तेव्हा काय घडले यावरून संपूर्ण देशात तणावाचे वातावरण होते. त्यावेळी लाल चौकात तिरंगा ध्वज फडकवणेही अवघड होते. तिरंगा जाळण्यात आला. तिरंगा ध्वज फडकवल्यानंतर आम्ही जम्मूला आलो…तेव्हा जम्मूहून मी पहिला फोन माझ्या आईला केला. माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण होता. दुसरा विचार असा होता की आईला काळजी वाटत असेल. त्या फोन कॉलचे महत्त्व मला आज समजते. तसा अनुभव इतर कोठेही आला नाही.
डिसेंबर 1991 मध्ये भारतीय जनता पक्षाने कन्याकुमारी येथून एकता यात्रा सुरू केली. 26 जानेवारी 1992 रोजी लाल चौक, श्रीनगर येथे या यात्रेचा समारोप होणार होता. हा प्रवास देशातील 14 राज्यांमधून झाला होता. नरेंद्र मोदी या प्रवासात सहभागी झाले होते. दरम्यान, 23 जानेवारी 1992 रोजी फगवाडा येथे दहशतवाद्यांनी एकता यात्रेच्या बसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर पन्नासहून अधिक जखमी झाले होते.
श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याचे आव्हान दहशतवादी द्यायचे. श्रीनगरच्या भिंतींवर असे लिहिले होते की, ज्याने कोणी आपल्या आईचे दूध पिले त्याने येथे श्रीनगरला यावे आणि तिरंगा फडकावा. जर तो परत गेला तर आम्ही त्याला बक्षीस देऊ. यानंतर 25 जानेवारीला एकता यात्रेत मोदींनी आवेशपूर्ण भाषण केलं – दहशतवाद्यांनो, कान देऊन ऐका. 26 जानेवारीला काही तास उरले आहेत. आईचे दूध कोणी प्यायले हे लाल चौकात ठरवले जाईल. यानंतर 26 जानेवारी 1992 रोजी मुरली मनोहर जोशी, नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी लाल चौकात तिरंगा ध्वज फडकावला आणि एकता यात्रेची सांगता केली.





