“आम्ही आमच्या लाडक्या बापूंसोबत …”; पंतप्रधानांनी महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली , लाल बहादूर शास्त्रींचेही केले स्मरण

PM Modi On Gandhi Jayanti । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. त्यांनी यावेळी, “भारत स्वावलंबी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करेल. ” असे म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी राजघाटावरही भेट दिली आणि महात्मा गांधींना पुष्पांजली वाहिली.
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी, “गांधी जयंतीनिमित्त, आपण आपल्या प्रिय बापूंचे असाधारण जीवन आठवतो, ज्यांच्या आदर्शांनी मानवी इतिहास बदलला. त्यांनी दाखवून दिले की धैर्य आणि साधेपणा हे महान बदलाचे साधन असू शकते. लोकांना सक्षम करण्यासाठी सेवा आणि करुणेच्या शक्तीवर त्यांचा विश्वास होता. विकसित भारताच्या उभारणीच्या आपल्या ध्येयात आपण त्यांच्या मार्गाचे अनुसरण करत राहू.”लिहिले.
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन PM Modi On Gandhi Jayanti ।
सत्य, अहिंसा आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या समर्पणासाठी गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधींचे स्मरण केले जाते. हा दिवस केवळ त्यांच्या शांती आणि नैतिक जीवनाच्या विचारसरणीचा सन्मान करत नाही तर जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून देखील साजरा केला जातो.
Gandhi Jayanti is about paying homage to the extraordinary life of beloved Bapu, whose ideals transformed the course of human history. He demonstrated how courage and simplicity could become instruments of great change. He believed in the power of service and compassion as… pic.twitter.com/LjvtFauWIr
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2025
पंतप्रधान मोदींनी लाल बहादूर शास्त्री यांनाही श्रद्धांजली वाहिली PM Modi On Gandhi Jayanti ।
महात्मा गांधींव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनाही श्रद्धांजली वाहिली. व्यासपीठावरील आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “लाल बहादूर शास्त्री हे एक महान राजकारणी होते ज्यांच्या प्रामाणिकपणा, नम्रता आणि दृढनिश्चयाने भारताला बळकटी दिली. त्यांनी आव्हानात्मक काळातही नेतृत्व, ताकद आणि निर्णायक कृतीचे उदाहरण दिले. ‘जय जवान जय किसान’ हा त्यांचा नारा आपल्या लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करतो. मजबूत आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये ते आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत.” लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे झाला. जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर १९६४ मध्ये लाल बहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान बनले.





