“अक्साई चीन, सिंधू पाणी करार, पीओके, करतारपूर साहिब…” ; पंतप्रधानांनी काँग्रेसच्या एकामागून एक चुकांचा वाचला पाढा

PM Modi on Congress । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काल ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीला अपयशी ठरवले आणि अनेक प्रश्न उपस्थित केले.त्यांच्या याच टीकेला आणि प्रश्नांना पंतप्रधानांनी उत्तर दिले.
लोकसभेत आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान यांनी, “काँग्रेस आपल्या परराष्ट्र धोरणावर आणि राजनैतिकतेवर प्रश्न उपस्थित करत आहे, मी त्यांच्या सरकारांच्या राजनैतिकता आणि परराष्ट्र धोरणाची काही उदाहरणे देऊ इच्छितो. ” असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका करण्यात सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी आरोप केला की,”काँग्रेस सरकारांनी वारंवार भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली आहे.” यावली मोदींनीकच्छातिवु बेट, पीओके, अक्साई चीन आणि करतारपूर साहिब यावरील काँग्रेसच्या चुका निवडकपणे सूचीबद्ध केल्या.
पंतप्रधान मोदींनी टीका करताना , “मागील काँग्रेस सरकारांनी घेतलेल्या काही ऐतिहासिक निर्णयांचे दीर्घकालीन परिणाम झाले आहेत, ज्यात पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत मिळवण्याची संधी गमावणे, अक्साई चीनला पडीक जमीन म्हणून घोषित करून चीनला सोपवणे आणि सिंधू पाणी कराराअंतर्गत भारताचे पाण्याचे हक्क पाकिस्तानला देणे यांचा समावेश आहे.” असे त्यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘जेव्हा जेव्हा मी पंडित नेहरूंबद्दल बोलतो तेव्हा काँग्रेस आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था खवळते.’ मला एक ओळ आठवते, क्षणांनी चूक केली, शतकांना शिक्षा मिळाली. स्वातंत्र्यानंतर घेतलेल्या निर्णयांचे परिणाम देश अजूनही भोगत आहे. काँग्रेस नेते विचारत आहेत की मी पीओके परत का घेतले नाही? आणि ते माझ्याकडूनही ही अपेक्षा करू शकतात. पण प्रश्न विचारणाऱ्यांना आधी याचे उत्तर द्यावे लागेल.
काँग्रेस करतारपूर साहिबही परत घेऊ शकली नाही PM Modi on Congress ।
पुढे त्यांनी विरोधकांना विचारले, ‘पीओके परत घेण्याची संधी कोणाच्या सरकारने गमावली?’ अक्साई चीनला ओसाड जमीन म्हणून कोणी घोषित केले आणि ती चीनला कोणी दिले? १९७१ च्या युद्धानंतर, ९३ हजार पाकिस्तानी सैनिक आमच्या ताब्यात होते आणि त्यांच्या प्रदेशाचा हजारो चौरस किलोमीटर भाग आमच्या सैन्याच्या ताब्यात होता. आपण पीओके सहजपणे परत घेऊ शकलो असतो. पण ही संधी हुकली. पीओके सोडाच, ते करतारपूर साहिब परत घेऊ शकले असते, पण तसे झाले नाही. काँग्रेस सरकारांची ही दूरदृष्टी आणि कूटनीती होती.” असे त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे सिंधू पाणी कराराला नेहरूंची सर्वात मोठी चूक म्हणत पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सांगितले की, ‘सिंधू पाणी करारांतर्गत पंडित नेहरूंनी भारतातून वाहणाऱ्या नद्यांचे ८० टक्के पाणी पाकिस्तानला देण्याचे मान्य केले. भारत फक्त २० टक्के पाणी वापरू शकत होता. या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाब सारख्या राज्यांना अभूतपूर्व पाणी संकटाकडे ढकलले गेले. एवढेच नाही तर, दिवंगत नेहरूंनी भारताच्या वाट्याचे पाणी देण्यासाठी कालवा बांधण्यासाठी पाकिस्तानला पैसेही दिले.
रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही PM Modi on Congress ।
तसेच पुढे बोलतां मोदींनी, “सिंधू पाणी कराराबाबत नेहरूंनी केलेली चूक त्यानंतरच्या काँग्रेस सरकारांनीही सुधारली नाही. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की एनडीए सरकारने ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’ हे स्पष्ट केले आहे आणि पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवेपर्यंत सिंधू पाणी करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. “ते म्हणाले की, १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला काँग्रेस नेते शांततेच्या नावाखाली पूंछ, उरी, नीलम व्हॅली आणि किशनगंगा सारखे भाग पाकिस्तानला सोडण्यास तयार होते.
१९६६ च्या संघर्षादरम्यान काँग्रेस पक्षाने कच्छच्या रणाशी तडजोड केल्याचा आरोपही पंतप्रधान मोदींनी केला. ते म्हणाले की, तत्कालीन काँग्रेस सरकारने आंतरराष्ट्रीय लवाद जवळजवळ स्वीकारला होता आणि कच्छच्या रणातील सुमारे ८०० किलोमीटर जमीन पाकिस्तानला देणार होते. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, सिंधू पाणी करारात मध्यस्थीसाठी जागतिक बँकेकडे जाण्याचा काँग्रेस सरकारचा निर्णय हा देशाशी विश्वासघात आहे. ते म्हणाले, ‘पाणी आमचे आहे, नद्या आमच्या आहेत, पण कोण ठरवणार?’ जागतिक बँक? ” असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कच्छातिवु बेट १९७४ मध्ये श्रीलंकेला भेट देण्यात आले होते. आजही आपल्या मच्छीमार बंधू आणि भगिनींना त्याठिकाणी समस्यांचा सामना करावा लागतो; कधीकधी, त्यांच्या जीवाला धोका असतो.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
आम्ही आमचे धरणे गाळू शकलो नाही
पंतप्रधान मोदी म्हणाले की, नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारताने पाकिस्तानशी एक करार केला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की आपण आपल्या धरणांमध्ये साचलेला गाळ साफ करू शकत नाही. जेव्हा मी त्याचा अभ्यास केला तेव्हा मला कळले की देशात एक धरण आहे ज्याचे दरवाजे वेल्डिंग करून बंद केले गेले होते जेणेकरून ते गाळ काढण्यासाठी चुकूनही उघडले जाऊ नयेत. सशस्त्र दलांना मुक्तपणे काम करू देण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारकडे नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी हा कडक प्रत्युत्तर दिला.





