‘भारत बंदुकीच्या धाकावर व्यवहार करत नाही’ ; अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेवर पियुष गोयल यांनी स्पष्टच सांगितलं

Piyush Goyal in America । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर कर लादण्याची घोषणा केली. मात्र ८ दिवसातच त्यांनी तब्बल ७५ देशांवरील कर ९० दिवसांसाठी स्थगित केले आहेत. असे असताना भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दोन्ही देशातील व्यापारावर भाष्य केले आहे. भारत आणि अमेरिकेत व्यापार करारासाठी चर्चा सुरू आहे. भारताचे हित सर्वोपरि राहील आणि कोणत्याही दबावाखाली चर्चा केली जाणार नाही” असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील करा संदर्भात भाष्य करताना पियुष गोयल यांनी,”मी हे आधीही अनेकदा सांगितले आहे की आम्ही बंदुकीच्या धाकावर करार करत नाही. वेळेचे बंधन चांगले असते कारण ते वाटाघाटींना गती देतात, परंतु जोपर्यंत आपण देशाचे आणि लोकांच्या हिताचे रक्षण करू शकत नाही तोपर्यंत घाईघाईने काहीही करणे योग्य नाही,” असे गोयल यांनी यावेळी सांगितले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता सर्व देशांवर परस्पर आयात शुल्कावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचे हे विधान आले. आता चीनवर १४५ टक्के शुल्क आकारले जाणार आहे. भारतासह ७५ देशांना आता ९० दिवसांची आयात शुल्कातून सूट मिळाली आहे.
दोन्ही देशांमधील व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल Piyush Goyal in America ।
भारत आणि अमेरिका यांच्यातील सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या व्यापार कराराचा पहिला टप्पा अंतिम करण्याचे उद्दिष्ट आहे. २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार सध्याच्या १९१ अब्ज डॉलर्सवरून ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या अलिकडेच झालेल्या बैठकीनंतर भारत आणि वॉशिंग्टन यांनी २०२५ च्या शरद ऋतूपर्यंत द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यातील वाटाघाटी पूर्ण करण्याचे मान्य केले आहे.
भारत-युरोपियन युनियनव्यापार कराराबद्दल गोयल यांनी, “जेव्हा दोन्ही बाजू एकमेकांच्या चिंता आणि आवश्यकतांबाबत संवेदनशील असतील तेव्हाच वाटाघाटी पुढे जातील, तसेच “सर्व व्यापार वाटाघाटी ‘इंडिया फर्स्ट’ या भावनेने आणि विकसित भारत २०४७ च्या दिशेने चांगल्या प्रकारे प्रगती करत आहेत. मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.”असे त्यांनी म्हटले.
भारत आणि युरोपियन युनियनमध्ये चर्चा Piyush Goyal in America ।
दुसरीकडे, या करारावर भाष्य करताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी, भारत अमेरिका आणि युरोपियन युनियन या दोन्ही देशांसोबत व्यापार करार करण्यासाठी वेगाने प्रयत्न करत आहे. ” असे सांगितले आहे. त्यांनी असेही म्हटले की, “डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने भारताच्या प्रस्तावांना त्वरित प्रतिसाद दिला” असे सांगितले. जयशंकर म्हणाले, “प्रशासन बदलल्यानंतर एका महिन्याच्या आत, आमचा तत्वतः करार झाला की आम्ही द्विपक्षीय व्यापार करार करू आणि दोन्ही बाजूंसाठी उपयुक्त असा तोडगा काढू, कारण आम्हालाही चिंता आहेत. ही प्रक्रिया अनिश्चित नाही.





