पुणे – ‘पाणी’ फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यस्तरावर सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी या गावाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. सिने अभिनेते आणि पाणी फाउंडेशनचे प्रमुख आमीर खान आणि किरण राव यांच्या हस्ते सरपंचांसह ग्रामस्थांनी हा पुरस्कार स्विकारला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सुर्डी गावाला पाणी फाउंडेशनकडून 75 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले आहे. पुण्यातील बालेवाडी येथे पाणी फांउडेशनच्यावतीने शानदार पुरस्कार सोहळा पार पडला.
सोलापूर जिल्ह्यातून 6 तालुक्यांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली होती. त्यामध्ये, बार्शी, करमाळा, उत्तर सोलापूर, माढा, मंगळवेढा आणि सांगोला या तालुक्यांचा सहभाग होता.
वॉटर कप स्पर्धेतील विजेते :
प्रथम क्रमांक
सुर्डी गाव (ता.बार्शी, सोलापूर)
व्दितीय क्रमांक
पिंपरी जलसेन (ता.पारनेर,अहमदनगर)
शिंदी खुर्द (ता.माण, सातारा)
A big congratulations to the joint second prize winners of the Satyamev Jayate Water Cup 2019! More power to Pimpri Jalsen and Shindi Khurd villages for their stellar work in watershed management. We salute these warriors against drought! #WaterCup2019 pic.twitter.com/CMSxcqPJaH
— Paani Foundation (@paanifoundation) August 11, 2019
तृतीय क्रमांक
आनोरे (ता.अमळनेर, जळगाव)
देवऱ्याची वाडी (बीड)
बोरव्हा बुद्रुक(ता.मंगरूळपीर जि. वाशिम)
A big congratulations to the joint third prize winners of the Satyamev Jayate Water Cup 2019! We salute these water warriors from Borvha Budruk, Devryachiwadi and Anore for their excellent watershed management work.#WaterCup2019 pic.twitter.com/pVRfb1aI48
— Paani Foundation (@paanifoundation) August 11, 2019