‘पंकजा मुंडे मंत्री तर प्रीतम मुंडे खासदार होत्या, बीडचा विकास का केला नाही’ सुषमा अंधारे यांचा सवाल

Sushma Andhare । शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. ही लोकसभा निवडणूक जातीवादावर गेली नसून विकासावर गेली बीडच्या स्थानिक प्रश्नांवर चर्चा कोण करणार आहे की नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीत मुंडेंचा पराभव झाला यामुळे अनेकांनी मत व्यक्त करतांना असे म्हटले की,पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या तर फार विकास झाला असता, आत्तापर्यंत त्यांचा कोणी हात धरला होता का? असं म्हणत सुषमा अंधारेंनी मुंडेंना टोला लगावला.
त्या पुढे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईनं पंकजा मुंडे आमदार झाल्या, ग्रामविकास मंत्रालय त्यांनी संभाळलं आहे. त्यांची बहिण प्रीतम मुंडे खासदार होत्या, का विकास केला नाही? परळीत एमआयडीसी का येऊ शकली नाही? प्रीतम मुंडे यांनी काय विकास केला ? केवळ विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या.’ असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सभेत डायरेक्ट इथल्या मुस्लिम समाजाबाबत बोलले होते. मोदी यांनी जातीवादी भाषण केलं. जाती समूह बदनाम करणं हे थांबवणं गरजेचं आहे. मोदी यांची सभा पंकजा मुंडे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली, हे मान्य केलं जात नाही. पंकजा मुंडे यांनी आपल्या पराभवाचं खापर मराठा किंवा ओबीसी, जातींवर फोडण्यापेक्षा आपल्या नेत्यांचा भाषणावर फोडावे. असं म्हणत त्यांनी मोदींमुळेच मुंडेंचा पराभव झाल्याचे मत व्यक्त केले.





