Pankaja Munde । देशात आगामी लोकसभा निवडणूका पार पडणार आहे . त्यानुसार प्रत्येक पक्ष आपापल्या परीने जोरदार प्रचार करत आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती आणि प्रचाराची तयारी सर्व पक्षांनी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहे.
या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) नेतेही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. या अनुषंगाने जागावाटपाची चर्चा या दोघांमध्ये झाल्याचं समजतं आहे.
अशात लोकसभेच्या महाराष्ट्रातील एकूण ४८ जागा आहे. या जागेच वाटप कस होणार असा प्रश्न नेहमीच चर्चेत आला आहे. अशात आता भाजपकडून कुणाला उमेदवारी देण्यात येणार याची चर्चा होत आहे. आगामी लोकसभेसाठी त्या बीडमधून लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे
‘लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या बूथ रचना केली जात आहे आणि या कामाला कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2014 आणि 19 मध्ये याच कार्यकर्त्यांनी माझ्या बाजूने चांगलं काम केलं होतं त्यामुळे उमेदवार कोण असेल हे येणाऱ्या काळात निश्चित होईल’
‘राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर पाहिजे तेवढ्या प्रमाणात धोकादायक परिणाम होणार नाही. मराठा समाजाने ठरवावे किती आरक्षण हवं आहे की नाही यावर अनेकदा मी माझी भूमिका स्पष्ट केल्याचं म्हणत पंकजा मुंडेंनी अधिक बोलणं टाळलं.’
हेही वाचा
Ashok Saraf | अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान