Palghar News : पालघर जिल्ह्यातील (Palghar News) बोईसर परिसरातील तारापूर एमआयडीसीमधील एका औषध निर्मिती कारखान्यात रसायनाची गळती झाल्यामुळे २० हून अधिक कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारी १:४५ च्या सुमारास, डाय-मिथाइल सल्फेट हे रसायन एका टँकरमध्ये भरताना घडली, असे पालघरच्या (Palghar News) जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांनी सांगितले. टँकरच्या व्हेंट लाइनमधून रसायनाचा काहीसा भाग ओसंडून बाहेर आला आणि जमिनीवर सांडला. संबंधित ऑपरेटरने ही गळती तात्काळ थांबवली असली, तरी त्यानंतर करण्यात आलेल्या शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेल्या वाफांचा परिणाम अनेक कर्मचाऱ्यांवर झाला. जमिनीवर सांडलेले रसायन चुना आणि सोडा ॲशचा वापर करून दुपारी २:३० वाजेपर्यंत निष्प्रभ करण्यात आले. Palghar News तथापि, डाय-मिथाइल सल्फेटच्या रासायनिक गुणधर्मांमुळे साफसफाईच्या कामात सहभागी असलेल्या काही सुरक्षा कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना डोळ्यांची जळजळ होण्याचा त्रास जाणवला. एकूण २२ कामगारांना सुरुवातीला कारखान्यातच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते, मात्र त्यांची लक्षणे कायम राहिल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बोईसर (Palghar News) येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. बाधित झालेल्या सर्व व्यक्तींची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.