Manoj Jarange : “बाकीच्या राज्यात जातपडताळणी समिती नाही, मग महाराष्ट्रात कशाला”; मनोज जरांगेंचा सरकारला सवाल
Manoj Jarange : आज माध्यमांसोबत संवाद साधताना मनोज जरांगे यांनी थेट जात पडताळणी समितीच बरखास्त करण्याची मोठी मागणी केली आहे. देशात कुठेही जातपडताळणी समिती नाही मग राज्यात का, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

Manoj Jarange : आजपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे आंदोलनाला बसले आहेत. हे शेवटचे निर्णायक आंदोलन असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मराठा समाजासाठी ही शेवटची लढाई असून कुणीही घरात बसू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी सरकावरला जाब विचारत मोठी मागणी केली आहे.
५८ लाख नोंदींच्या आधारे सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं या जुन्या मागणीसह जातपडताळणीत नाकारलेली प्रमाणपत्रही यासंह विविध मागण्यासाठी मनोज जरांगे मैदानात उतरले आहेत. आज माध्यमांसोबत संवाद साधताना मनोज जरांगे यांनी थेट जात पडताळणी समितीच बरखास्त करण्याची मोठी मागणी केली आहे. देशात कुठेही जातपडताळणी समिती नाही मग राज्यात का, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
देशात कोणत्याही राज्यात जात पडताळणी समिती नाही. मग महाराष्ट्रात कशाला? मनोज जरांगेंचा सवाल
‘बाकीच्या राज्यात जातपडताळणी समिती नाही मग महाराष्ट्रात कशाला? यात मराठ्यांचा फायदा नाही सगळ्यांचाच फायदा. यांना विरोध कशाला करावा हेच कळत नाही. सगळं असूनही जात पडताळणी समिती का व्हॅलिटीडी नाकारते. देशात कोणत्याही राज्यात जात पडताळणी समिती नाही. मग महाराष्ट्रात कशाला? जात पडताळणी समितीला पैसे द्यायचे कुठून ज्यांचा या मागणीला विरोध असेल त्यांनी विरोध असू द्यावा, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलीडिटी कोणत्या पद्धतीने देणार हे समजाऊन सांगा
‘शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र तात्काळ द्या. सरकारने कुणबी प्रमाणपत्र वाटप वेगाने वाटप करावे. वाटप करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या व्हॅलीडिटी द्या. हैद्राबाद गॅझेटीयर नुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप करून व्हॅलीडिटी कशी देणार हे स्पष्ट करा. कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलीडिटी कोणत्या पद्धतीने देणार हे समजाऊन सांगा, अशी मागणीही मनोज जरांगेंनी सरकारकडे केली आहे.
….तर अंतरवाली सराटी येथून मराठा बांधव मुंबईकडे कूच करतील : मनोज जरांगेंचा मोठा इशारा
आम्ही जो पर्यंत मागणी मान्य होत नाही तो पर्यंत हलणार नाही. चर्चा करायला कधी ही या ना काय अडचण आहे आम्ही मात्र हलणार नाही. यांना मराठ्यांच्या पोरांच चांगलं होवू द्यायचं नाही. येत्या काही दिवसात तोडगा निघाला नाही तर अंतरवाली सराटी येथून मराठा बांधव मुंबईकडे कूच करतील, असा मोठा इशारही मनोज जरांगेंनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भगवं वादळ मुंबईत धडकण्याची शक्यता आहे.






