Oscar Award : ऑस्करसाठी भारताकडून ‘या’ मराठी चित्रपटाची अधिकृत निवड
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी जाहीर केले की, ऑस्कर २०२७ पुरस्कारांसाठी (Oscar Award) भारताची अधिकृत प्रविष्टी म्हणून संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित मराठी चित्रपट गोंधळची निवड करण्यात आली आहे.

Oscar Award : फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी जाहीर केले की, ऑस्कर पुरस्कार २०२७ साठी (Oscar Award) भारताची अधिकृत प्रविष्टी म्हणून संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित मराठी चित्रपट गोंधळची निवड करण्यात आली आहे. ३३ चित्रपटांमधून निवड समितीने या चित्रपटाची निवड केली.
ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित गोंधळचे (Oscar Award) कथानक नवविवाहित जोडप्याशी संबंधित एका पारंपरिक विधीच्या एका रात्रीत घडते. निवड समितीचे अध्यक्ष पी. शेषाद्री यांनी चित्रपटाची निवड जाहीर केली.
ऑस्करसाठी भारताकडून निवड होणारा गोंधळ हा चौथा मराठी चित्रपट आहे. यापूर्वी श्वास (२००५), हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९) आणि कोर्ट (२०१५) या मराठी चित्रपटांची भारताची अधिकृत प्रविष्टी म्हणून निवड झाली होती.
गेल्या वर्षी नीरज घायवान दिग्दर्शित होमबाउंडची भारताकडून अधिकृत निवड झाली होती. मात्र, त्याला अंतिम नामांकन मिळाले नाही. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत भारताला अद्याप ऑस्कर (Oscar Award) मिळालेला नाही. मदर इंडिया, सलाम बॉम्बे आणि लगान या तीन भारतीय चित्रपटांना या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. वॉटरला नामांकन मिळाले होते; मात्र तो कॅनडाकडून सादर झाला होता. ९९ वा ऑस्कर सोहळा १४ मार्च २०२७ रोजी होणार आहे.






