बिहार एसआयआरवर विरोधकांचा गोंधळ ; फलकांसह खासदारांचा वेलमध्ये प्रवेश , दोन्ही सभागृह दुपारपर्यंत तहकूब

Opposition’s confusion over Bihar SIR । संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवात देखील गोंधळानेच झाली. विरोधकांनी आज बिहारच्या एसआयआरचा मुद्दा उपस्थित करत सभागृहात गोंधळ घातल्याचे पाहायला मिळले. दरम्यान, राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी एक दिवस आधी उपाध्यक्षपदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा दिला होता.त्यामुळे आज उपसभापती हरिवंश यांनी राज्यसभेत आपली जागा घेतली आहे. तर तिकडे लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला खुर्चीवर आहेत.
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज गोंधळाने सुरु झाले. गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाल्यानंतर पाच मिनिटांतच तहकूब करण्यात आले. आज राज्यसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा सभागृहाचे उपसभापती हरिवंश हे अध्यक्षस्थानी आले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात विरोधकांनी केलेल्या गोंधळावर नाराजी व्यक्त केली आणि म्हणाले की,”हे सभागृह घोषणाबाजीसाठी नाही तर चर्चेसाठी आणि संवादासाठी आहे.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,”मी कोणालाही फलक घेऊन जाऊ देणार नाही.तसेच आज प्रश्नोत्तराच्या तासात देशातील शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांवर, विशेषतः आपत्ती संकटावर चर्चा होणार आहे. पण जर तुम्ही चर्चेऐवजी गोंधळ निर्माण करण्याच्या उद्देशाने येत असाल तर ते सभागृहाच्या प्रतिष्ठेला आणि लोकशाही परंपरांना अनुसरून नाही.” असे म्हटले आहे. Opposition’s confusion over Bihar SIR ।
तर दुसरीकडे राज्यसभेचे कामकाज सुरू होताच गोंधळामुळे ते तहकूब करण्यात आले. उपसभापती हरिवंश यांनी सभागृह दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्याची घोषणा केली होती. १२ वाजता कामकाज सुरू झाले तेव्हा गोंधळ सुरूच होता. अध्यक्षस्थानावरून घनश्याम तिवारी यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केल्याची घोषणा केली.
बिहारमधील मतदार यादीच्या सखोल पुनर्रचनाच्या मुद्द्यावर लोकसभेतील विरोधी पक्ष आक्रमक आहे. विरोधी पक्षाचे सदस्य वेलमध्ये आले आणि त्यांनी फलक फडकवत घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षाचे सदस्य एसआयआर परत घ्या अशी घोषणा देत होते. अध्यक्षस्थानी असलेल्या जगदंबिका पाल यांनी सर्व सदस्यांना त्यांच्या खुर्चीवर जाण्याचे आवाहन केले आणि सांगितले की तुम्हाला ज्या विषयावर चर्चा करायची आहे, तो विषय व्यवसाय सल्लागार समितीमध्ये उपस्थित करा. सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास आणि त्यांना उत्तर देण्यास तयार आहे. हे सदन तुमचे आहे, आम्हाला सदन चालवायचे आहे. फलक फडकवण्याऐवजी, ते लेखी स्वरूपात द्या आणि प्रस्ताव आणा. ” असे म्हटले. बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेत गोंधळ सुरूच आहे. गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. Opposition’s confusion over Bihar SIR ।





