‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताचे पुन्हा पाकला सडेतोड उत्तर ; ५ पोलिस चौक्यासह १ दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त

OPERATION SINDOOR । सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जम्मू सीमेवरील एका कारवाईत पाच पाकिस्तानी चौक्या आणि एक दहशतवादी लॉन्चपॅड उद्ध्वस्त केला. काल एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ऑपरेशन सिंदूर दरम्यानभारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव खूप वाढला.
पाच चौक्या पूर्णपणे नष्ट OPERATION SINDOOR ।
एका वृत्तसंस्थेशी बोलताना बीएसएफ कमांडंट चंद्रेश सोना यांनी ही माहिती दिली. त्यांनी यावेळी बोलताना, “आम्ही त्यांच्या (पाकिस्तानच्या) गोळीबाराला योग्य उत्तर दिले. आम्ही त्यांच्या अनेक मालमत्ता नष्ट केल्या. मस्तपूरमध्ये त्यांचा एक लॉन्चपॅड होता, जो आम्ही नष्ट केला. आमच्या कारवाईमुळे त्यांच्या पाच चौक्या पूर्णपणे नष्ट झाल्या आणि आम्ही त्यांचे अनेक बंकर देखील नष्ट केले.”अशी माहिती त्यांनी दिली.
बीएसएफ कमांडंट सोना यांनी याविषयी बोलताना, “ऑपरेशन सिंदूरपासून पाकिस्तान सतत नागरी क्षेत्रे आणि भारतीय प्रतिष्ठानांना लक्ष्य करत आहे.”असे त्यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना त्यांनी,”१० मे रोजी पाकिस्तानने आमच्या चौक्या, तैनाती स्थळे आणि गावांना लक्ष्य केले. त्यांनी ६१ मिमी आणि ८२ मिमी मोर्टारचा वापर करून जोरदार गोळीबार केला.”असे सांगितले.
ते म्हणाले, “आम्ही पाकिस्तानी सैन्याचा सामना करत होतो जे पाकिस्तानी रेंजर्ससोबत लढत होते. आम्ही पाकिस्तानी सैन्य आणि रेंजर्स दोघांचेही मोठे नुकसान केले.” गोळीबार थांबल्यानंतर अनेक तासांपर्यंत रुग्णवाहिका जखमींना चेकपॉइंट्सवरून रुग्णालयात नेताना दिसल्या, असे सोना म्हणाल्या.
महिला जवानांच्या भूमिकेचे कौतुक OPERATION SINDOOR ।
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान महिला जवानांच्या भूमिकेचे कौतुक करत त्या अधिकाऱ्याने म्हटले की, “प्रत्येक बीएसएफ बटालियनमध्ये महिला कॉन्स्टेबल असतात. त्यांनी घरी जाण्यास किंवा बटालियन मुख्यालयात परतण्यास नकार दिला. तसेच,”त्या त्यांच्या सहकाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या आहेत आणि पाकिस्तानला योग्य उत्तर देत आहेत असे म्हटले.





