एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह..! हेमंत रासनेंचे कार्यालय ठरतयं सर्वसामान्यांना आधार

पुणे : नागरिकांच्या समस्यांचे निवारण, तत्काळ उपाययोजना, लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविणे, विविध शासकीय दाखले व प्रमाणपत्रे, आपत्कालिन परिस्थितीत मदत यासाठी हेमंत रासने यांचे जनसंपर्क कार्यालय सर्वसामान्यांचा आधार ठरत असून, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह योजना यशस्वी ठरत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
रासने यांच्या प्रचारार्थ शुक्रवार पेठेतील कुमठेकर रोड, गायआळी चौक, गाडगीळ स्ट्रीट, भिकारदास मारुती, खजिना विहीर, नातू बाग परिसरात रासने यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे- पाटील, राघवेंद्र मानकर, अशोक येनपुरे, राजेश येनपुरे, गायत्री खडके, दिलीप काळोखे, प्रमोद कोंढरे, प्रणव गंजीवाले, अमित कंक, सुनील रसाळ, नीलेश कदम, श्रेयस लेले, बिपीन बोरावके, परेश मेहेंदळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बाबत बोलताना रासने म्हणाले की, रासने पुढे म्हणाले, संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही वीस हजार हून अधिक नागरिकांना मदत केली आहे. शासकीय दाखले प्रमाणपत्र आर टी ई प्रवेश, निराधारांच्या योजना याची संख्याही पाच हजाराहून अधिक आहे.
एक कॉल प्रॉब्लेम सोल या योजनेअंतर्गत सात हजार हून अधिक नागरिकांची विकास कामे मार्गी लावली. त्यामध्ये ड्रेनेज लाईन, शौचालय निर्मिती, रस्ता डांबरीकरण, जलवाहिनी दुरुस्ती, कीटकनाशक फवारणी, पथदिवे दुरुस्ती, सोसायटी आणि वाड्यातील विकास कामांचा समावेश आहे.
गेली आठ दिवस मी प्रचाराच्या निमित्ताने विविध भागांतील नागरिकांना भेटत आहे. दीड वर्षे भाजपच्या माध्यमातून आम्ही करीत असलेल्या कामाबद्दल नागरिक कौतुक करीत असून, समाधानाची भावना व्यक्त करीत आहेत.
– हेमंत रासने ( भाजप, महायुतीचे उमेदवार)





