मुंबई – दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली. तसेच माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली.
21 मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन. यानिमित्त मंत्रालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार आदींसह मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी दहशतवादविरोधी प्रतिज्ञा घेतली व दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले.