मुंबई – राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis reply to Sharad Pawar ) यांनी ठाकरे सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही असा गंभीर आरोप केला आहे. राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगित करण्यात आले असून याबाबत बोलताना फडणवीस यांनी, ‘जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत सरकारला कारणे सांगायची आहेत. या सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही.’ असा आरोप लगावला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या विधानावर देखील प्रतिक्रिया दिली.
“शरद पवारांना हे चांगलं माहिती आहे की देशात सगळीकडे ओबीसी आरक्षण सुरू आहे. कुठेही गेलेलं नाही ते केवळ महाराष्ट्रात गेलेलं आहे. फक्त महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षण गेलं आहे, दुसऱ्या कुठल्याही राज्यातील गेलेलं नाही. या राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि अजूनही तो नाकर्तेपणा सुरू आहे.” असं म्हणत फडणवीस यांनी शरद पवार यांचा केंद्र सरकारवरील आरोप खोडून काढला. ( Devendra Fadanvis reply to Sharad Pawar )
महापालिका, नगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत चालढकल
यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकार ओबीसी आरक्षणाबाबत चालढकल करत असल्याचा आरोप करताना, “या राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही. जोपर्यंत महापालिका, नगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत चालढकल करायची आहे. तोपर्यंत कारणं सांगायची आहेत आणि तीच पद्धत या ठिकाणी सुरू आहे. कारण, ओबीसी आयोगाने स्वतः राज्य सरकारला पत्र पाठवून, आम्हाला पैसे द्या आम्हाला इम्पिरिकल डाटा जमा करायचा आहे, हे सांगितलं आहे.” असं म्हंटल. ( OBC reservation )
तत्पूर्वी, शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत ओबीसी आरक्षणाबाबत भाष्य केले होते. संसदेमध्ये १२७व्या घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारांकडे देण्यात आला आहे. मात्र आरक्षणाची मर्यादा अद्यापही ५० टक्के असल्याकडे लक्ष वेधताना पवार यांनी, ‘केंद्र सरकारने ताट तर वाढले आहे, मात्र हात बांधून ठेवलेत.’ असं म्हंटल होत.