…आता, गुजरात दंगलीप्रकरणी भाजपने माफी मागावी : नवाब मलिक
Updated On:
मुंबई – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी 45 वर्षांनंतर आणीबाणी लावण्याचा निर्णय चुकीचा होता हे स्वीकारले आहे. कॉंग्रेसने कुठे ना कुठे आपली चूक मान्य केली आहे. याआधी कॉंग्रेसने दिल्लीत झालेल्या दंग्यांसंदर्भात देखील माफी मागितली होती.
आता वेळ आली आहे की भाजपानेही गुजरातमध्ये जी दंगल झाली ती चुकीची होती हे स्विकारायला हवे आणि कॉंग्रेसने दिल्ली दंग्यांबाबत माफी मागितली त्याप्रमाणे आता भाजपाने देखील माफी मागितली पाहिजे, असे प्रतिपादन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केले.





