Hema Malini : “आंदोलन करून काहीही साध्य होणार नाही, मोदी सरकारनं खूप काम केलंय”; हेमा मालिनी यांच्या प्रतिक्रेयेमुळे नवा वाद!
Hema Malini : अशातच या आंदोलनवार ज्येष्ठ अभिनेत्री खासदार हेमा मालिनी यांनी आंदोलन करुन काहीही साध्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Hema Malini’s reaction to the ‘Cockroach Janata Party’s’ protest : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत कॅाकरोच जनता पार्टीने पुकारलेल्या ‘चलो संसद’ आंदोलनामुळे मोठा तणाव निर्माण झाला.
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारोंच्या संख्येने तरुणांनी संसदेकडे धाव घेतली. आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी संसद भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. (Hema Malini)
आंदोलकांना रोखताना पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच या आंदोलनवार ज्येष्ठ अभिनेत्री खासदार हेमा मालिनी यांनी आंदोलन करुन काहीही साध्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
#WATCH | Monsoon session of Parliament | Delhi: BJP MP Hema Malini says, “If there is a problem, it should be discussed properly. Protesting in this manner won’t achieve anything. As for the country’s youth and the education system, our Modi government has always stood by them… pic.twitter.com/4HQqf90fqk
— ANI (@ANI) July 20, 2026
एकीकडे या आंदोलनाला अनेक नामवंत कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते प्रकाश राज आणि नसरुद्दीन शाह यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन केले. या उलट हेमा मालिनी यांनी आंदोलन करून काही साध्य होणार नसल्याची प्रतिक्रिया दिल्याने यावरुन मोठा वाद निर्माण होऊ शकतो.
Crime News: ‘मोका’तील फरार आरोपी अटकेत, दोन पिस्तुले, १५ काडतुसे जप्त
नेमकं काय म्हणाल्या हेमा मालिनी? (Hema Malini)
“जर एखादा मुद्दा असेल, तर त्यावर योग्य प्रकारे चर्चा व्हायला हवी. अशा प्रकारे आंदोलन करून काहीही साध्य होणार नाही. देशातील तरुण आणि शिक्षण व्यवस्थेचा विचार करता, आमचं मोदी सरकार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, आम्ही बरीच कामं केलीयत” अशी प्रतिक्रिया खासदार हेमा मालिनी यांनी दिली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “तुम्ही करत असलेलं आंदोलन पूर्णपणे निरर्थक आहे. मला फक्त एवढंच म्हणायचंय की, प्रश्न संवादातूनच सोडवलं पाहिजेत. तुम्ही यात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता, पण त्यांना चुकीच्या मार्गाला लावू नये, बरोबर ना? समस्या स्पष्टपणे समजावून सांगितली पाहिजे. एखाद्या सकारात्मक गोष्टीचा भाग होताना त्यांना आनंद वाटला पाहिजे.” सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हेमा मालिनी यांनी (ANI) वृत्तसंस्थेला संसद भवन आवारात ही प्रतिक्रिया दिली.
पहिल्याच दिवशी संसदेत पडसाद (Hema Malini )
या आंदोलनाचे पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. लोकसभेत विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. परिणामी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक दिवसांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. राज्यसभेत देखील हेच घडले.
Satara: मंगल कार्यालयातील साडेचार लाखांच्या चोरीचा 48 तासांत छडा





