टोल नाक्यांवर थांबावे लागणार नाही, लवकरच पॉलिसी येणार; गडकरींची मोठी घोषणा

Nitin Gadkari | केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी टोल नाक्यांसंदर्भात एक महत्त्वाची माहिती सांगितली आहे. देशातील टोलनाकेच आता बंद व्हावेत यासाठी केंद्र सरकारने नवी यंत्रणा राबवण्याचा विचार केला आहे.
टोलबाबत मी जास्त सांगणार नाही, पण तुम्हाला लवकरच 15 दिवसांच्या आत अशी पॉलिसी येईल, की टोलबाबत तुमची कोणतीही तक्रार राहणार नाही. पण मी महाराष्ट्राच्या टोलबाबत बोलत नाही, NHI राष्ट्रीय महामार्गाबाबत बोलतोय, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. मुंबईतील दादर येथे डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करुन अमर हिंद मंडळाच्या 78 व्या व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार
“आम्ही सॅटलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टिम तयार करतोय. यामुळे टोलनाके राहणार नाहीत. तुम्हाला कोणी अडवणार नाही. कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबरप्लेटवरून टोल निघेल. तुम्ही जिथून निघालात तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाणार,” असेही नितीन गडकरी म्हणाले. तसेच, मुंबई-गोवा महामार्ग जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. Nitin Gadkari |
मुंबई ते बंगळुरू मार्ग
अटल सेतू जे आहे तिथून उतरल्यानंतर जेएनपीडीकडे जात असताना तिथून आम्ही एका रस्त्याचा काम सुरू केले आहे. तो तिथून डायरेक्ट पुण्याच्या रिंग रोडला मिळणार आहे आणि हा आपल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गापेक्षा तीन पट मोठा रुंदी आणि तिथून डायरेक्ट बंगळुरूला जाणार आहे. दोन ते तीन वर्षांमध्ये मुंबई ते बंगळुरू आपण पाच तासांमध्ये पोहोचू, याचे काम सुरू झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली. Nitin Gadkari |
प्रदुषण रोखण्यासाठी उपाय
दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे १० वर्ष आयुष कमी होईल असा अंदाज काढण्यात आला आहे, मुंबई पण या मार्गावर आहे. 1 लाख कोटी रुपयांची दिल्ली मध्ये रस्त्याची काम करत आहे. जमिनीच्या आतून आर्टिफिशल टनल बनवला आहे. त्यामुळे प्रदूषणापासून मुक्त करायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला ट्रॅफिक कॅपपासून मुक्ती मिळाली पाहिजे, असे गडकरी यांनी म्हटले.
या देशात पैशाची कमी नाही आहे, इमानदारीने देशाकरता काम करण्याची कमी आहे. मी संकल्प केला आहे की दरवर्षी १० लाख कोटी रुपयांची कामे करायची. मला काही पैशाची कमी नाही, 2 लाख 80 हजार कोटी रुपये हे माझं बजेट आहे, आता तीन लाख कोटी झालं आहे. पण माझा प्रश्न पैशाचा नाही, माझा प्रश्न एवढे पैसे खर्च का होत नाही हा आहे, अशी मिश्कील टीपण्णीही गडकरींनी केली. Nitin Gadkari |
रस्ते बांधणीसाठी यंदा ३ लाख कोटी रुपयांची तरतूद
‘रस्ते बांधणीसाठी यंदा ३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून नवे रस्ते बांधले जात असताना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांच्या रस्त्यावर जितके किलोमीटर गाडी चालवली जाईल, तितकाच पथकर घेतला जाईल, असे धोरण लवकरच आणण्यात येणार आहे. सध्या प्रगत देशाच्या तुलनेत दळणवळणाचा खर्च आपल्याकडे अधिक आहे. तो सध्याच्या १६वरून नऊ टक्क्यांवर आणला जाणार आहे’, असे गडकरी यांनी सांगितले. Nitin Gadkari |
हेही वाचा:
Ashok Chavan : अशोक चव्हाण, रोहित पवारांच्यात रंगला कलगीतुरा; एकमेंकावर केली सडकून टीका





