Nana Patole : ना रहेगा बास ना बजेगी बासरी.! ‘भाजप सरकारने लोकशाहीचा गळा घोटला’ – नाना पटोले
ना रहेगा बास ना बजेगी बासरी याच म्हणीचा वापर करत भाजप आणि मोदी सरकार देशात कारभार करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

Nana Patole – ना रहेगा बास ना बजेगी बासरी याच म्हणीचा वापर करत भाजप आणि मोदी सरकार देशात कारभार करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेवर आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
ईव्हीएममधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताच भाजपने मशिन्स जाळल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. भाजप सरकारने पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटल्याचे पटोले म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगापासून ते संपूर्ण निवडणूक मॅनेजमेंट आणि मॅच फिक्सिंग हे भाजपच्या बाजूने करण्याचा प्रयत्न झाला. हे चित्र संपूर्ण देश आणि पश्चिम बंगालची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होती.
हे संपूर्ण प्रकरण आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार आणि गडबड करण्यात आल्याचा आरोप पटोले यांनी केला.
ही बाब आता लोकांसमोर उघड होत आहे, हे समजताच पश्चिम बंगालमधील पराभवाच्या छायेखाली असलेल्या भाजप सरकारने ईव्हीएम मशिन्सच जाळून टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा घातपात मुद्दाम घडवून आणला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.





