कोल्हापूर – पिकाला किती नुकसान भरपाई द्यायची याचा अद्याप जीआर निघालेला नाही. शेतीचे 70 टक्के पंचनामे झाले आहेत. उसाचं, सोयाबीन ,भुईमूग इतर पिकांचे नुकसान किती झालय याचा जोपर्यंत याचा अंदाज येणार नाही तोपर्यंत मदत कशी द्यायची हा शासनासमोर प्रश्न आहे. एकदा जीआर निघूदे.. नाही समाधान झाले तर मोर्चे काढा मात्र आधीच मोर्चा काढू नका अशी विनंती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजू शेट्टींना केलीय. ते कोल्हापूरात बोलत होते.
व्हीओ-1- यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले, अद्याप पंचनामे झाले नाहीत. टीक्तच राज्याचा आर्थिक स्तोत्र अटलेले आहेत. 14 हजार कोटी रुपये हे सरकारी नोकरांचे पगार आणि निवृत्तीवेतन वरती जात आहेत. सध्या 12 हजार कोटी रुपये जमत आहेत. सध्या पैशाच्या मर्यादा अनेक आहेत. त्यातच कोरोनाचे खूप मोठे संकट आहे. निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ पाठोपाठ महापूर आला. या आठवड्यात आपल्याला मार्ग काढायचा आहे. शेतकऱ्याला आपण वाऱ्यावर सोडायचं नाही. दरम्यान राजू शेट्टी मध्ये अलीकडच्या काळात बदल झाला आहे. त्याचे उत्तर मला सापडले नाही. कदाचित राजेंद्र पाटील-यड्रावकर मंत्री झाले आहेत त्यामुळे त्यांच्यात बदल झाला असेल.