वज्रमूठ सभा! अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका, काय म्हणाले वाचा –
मुंबईत बीकेसी मैदानात महाराष्ट्र विकास आघाडीची वज्रमूठ सभा सुरू आहे. सभेला कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे समर्थक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषण अनेक मुद्दे मांडत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
अजित पवार यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –
सरकारला मस्तवाल पणा आला आहे. राज्यात लोकांच्या मनातील सरकार नाही. गद्दारी करून शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. सरकार निवडणुकांना का घाबरते आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. बाजार समितीत महाविका आघाडीला यश मोठे यश आले. कोरोना काळात महाविकास आघाडीनं चांगलं काम केले. सध्या राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. मुंबईचा सन्मान बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवला आहे. शिंदे-फडणवीस यांना लोकांच्या कामांशिवाय इतर गोष्टींतच जास्त रस आहे. जनतेला या सरकारची गद्दारी पटलेली नाही. जाहीरातबाजीवर नागरिकांचा पैसा खर्च केला जातोय, यांसह अनेक मुद्दे मांडत पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
अजित पवार यांचे संपूर्ण भाषण पाहा –





