NDA Bihar Bandh। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या अपमानाच्या विरोधात एनडीए रस्त्यावर उतरले आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ एनडीएने आज ‘बिहार बंद‘ची हाक दिली आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हा बंद जाहीर करण्यात आला, ज्या अंतर्गत एनडीएचे कार्यकर्ते वेगवेगळ्या शहरांमध्ये निषेध करत आहेत. मात्र, या काळात आपत्कालीन सेवा खंडित केल्या गेल्या नाहीत. दरम्यान, या बंदविषयी बोलताना, बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी, इंडिया अलायन्सच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींच्या दिवंगत आईला शिवीगाळ करण्यात आली होती. आज, एनडीएने पंतप्रधान मोदींच्या दिवंगत आईवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीच्या निषेधार्थ पाच तासांचा बिहार बंद पुकारला आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी.’अशी मागणी त्यांनी केली. तर भाजप खासदार रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींच्या दिवंगत आईला शिवीगाळ करण्यात आली आणि आजपर्यंत माफी मागितली गेली नाही हे खूप लज्जास्पद आहे.’ मी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना सांगू इच्छितो की जर आमच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याने अशी भाषा वापरली असती तर आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई केली असती… आम्ही त्याचा निषेध करतो. भारताची संस्कृती आईचा आदर करणे आहे… जर आमच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याने अशी भाषा वापरली असती तर आम्ही कारवाई केली असती आणि माफीही मागितली असती… बिहारचे लोक राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना योग्य उत्तर देतील.’ NDA Bihar Bandh। भाजप आमदार संजय मयुख म्हणाले, ‘एनडीएने पुकारलेल्या बंदमध्ये बिहारच्या माता आणि भगिनी सहभागी होत आहेत. महागठबंधन कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या दिवंगत आईवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यापासून तुम्ही पळून जाऊ शकत नाही. बिहारचे लोक राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना योग्य उत्तर देतील.’असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. एनडीएचे सर्व घटक पक्ष या बंदमध्ये सहभागी आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी इतर मित्रपक्षांच्या प्रदेशाध्यक्षांसह संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे पक्षाने या बंदची कमान महिला मोर्चाकडे सोपवली आहे. एनडीए नेत्यांचे म्हणणे आहे की पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ करून त्यांचा अपमान करण्यात आला आहे आणि अशा वर्तनाचा तीव्र विरोध केला जाईल. विरोधी पक्षांनीही एनडीएच्या ‘बिहार बंद’वर राजकीय हल्ले सुरू केले आहेत. आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले की, पंतप्रधान परदेशात हसत राहिले आणि भारतात परतताच रडू लागले. त्यांनी असा टोला लगावला की सरकारमधील लोकच बिहार बंद घडवत आहेत. तेजस्वी म्हणाले की, भाजपला बिहार यात्रेत जमलेल्या गर्दीची भीती वाटते, म्हणूनच अशी पावले उचलली जात आहेत. NDA Bihar Bandh।