Tamil nadu politics: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्याचे राजकारण एका अभूतपूर्व वळणावर येऊन ठेपले आहे. राज्यपाल आर.व्ही. आर्लेकर आणि अभिनेता विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षामधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, आता राज्यातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी DMK आणि AIADMK एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दशकांपासूनचे राजकीय वैर विसरून हे दोन पक्ष युती करणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विजयच्या TVK ला बहुमताची हुलकावणी – (Tamil nadu politics) अभिनेता विजयच्या TVK पक्षाने १०८ जागा जिंकून विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ जागांच्या आकड्यापासून विजय यांचा पक्ष १० जागा दूर आहे. याच राजकीय पोकळीचा फायदा उठवण्यासाठी आता DMK आणि AIADMK मध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. हेही वाचा – इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; 3 पर्यटकांचा होरपळून मृत्यू DMK च्या अटी आणि ‘भाजप’ फॅक्टर – सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, DMK ने AIADMK समोर युतीसाठी एक मुख्य अट ठेवली आहे. “AIADMK ने भाजपशी असलेले सर्व संबंध तोडावेत,” असे DMK ने स्पष्ट केले आहे. भाजपने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या युतीला पडद्यामागून पाठबळ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, भाजपचे प्रवक्ते एन. थिरुपती यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. हेही वाचा – तेलंगणात 800 वर्ष जुने शिवमंदिर प्रशासनाने पाडले राजकीय समीकरणांची जुळवाजुळव (Tamil nadu politics) ‘विदुथलै चिरुथैगल काची’ (VCK) सारख्या छोट्या मित्रपक्षांना मंत्रिपदे देऊन त्यांना विजय यांच्या गटात जाण्यापासून रोखण्यात DMK ला यश आले आहे. काँग्रेसने विजय यांच्या TVK पक्षाला पाठिंबा जाहीर केला असून, यामुळे DMK सोबतची त्यांची जुनी युती संपुष्टात आली आहे. काँग्रेस नेते माणिकम टागोर यांनी DMK वर धर्मनिरपेक्षतेशी प्रतारणा केल्याचा आरोप केला आहे. डाव्या पक्षांची कोंडी (Tamil nadu politics) CPI आणि CPI(M) हे पक्ष अद्याप द्विधा मनस्थितीत आहेत. DMK-AIADMK युतीला पाठिंबा द्यायचा की तटस्थ राहायचे, याचा निर्णय आज दुपारी होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. आकडेवारी काय सांगते? जर DMK आणि AIADMK आपल्या मित्रपक्षांसह एकत्र आले, तर त्यांच्याकडे १२० जागांचे बळ होईल, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा (११८) जास्त आहे. अशा स्थितीत विजय यांचा पक्ष सर्वात मोठा असूनही सत्तेपासून दूर राहू शकतो. (Tamil nadu politics) भाजपची प्रतिक्रिया – “तामिळनाडूत सरकार कोण स्थापन करणार हे काळच ठरवेल, पण काँग्रेसच्या पदरी शेवटी निराशाच पडेल,” असे ट्विट भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष यांनी केले आहे. तामिळनाडूच्या राजकारणातील हा सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, राज्यपाल कोणाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देतात, यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.