Eknath Khadse : पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आल्यानंतर राजकाणात मोठी खळबळ उडाली आहे. खडसेंनी कालच पत्रकार परिषदेतून हनी ट्रपचे आरोप करत कशा पद्धतीने यामध्ये अडकवले जाते याबाबत सांगितले होते. तसेच त्यांनी राज्यात वाढत्या अमली पदार्थांच्या सेवनाचा मुद्दाही उपस्थित केला होता. त्यानंतर आज त्यांचाच जावाई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. कसला हानी आणि कसला ट्रॅप? यानंतर आता राजकीय नेत्यांकडून याप्रकरणी प्रतिक्रिया समोर येत आहेत. गिरीष महाजन यांनी या पार्टीचे आयोजन त्यांच्याच जावयाने केल्याचा गंभीर आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रपच्या प्रकरणावरून विरोधकांकडून आवाज उठवला जात आहे. नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे नाना पटोले यांनी पेनड्राइव्ह दाखवत हनी ट्रपवर मोठा दावा केला होता. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसला हानी आणि कसला ट्रॅप? असे म्हटले होते. पुढे काय होणार? सध्या राजकारणात सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र सुरू असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे या सक्रिय राजकारणात आहेत. दोघेही सातत्याने विविध मुद्यांवर आक्रमक भूमिका घेत सरकाराला जाब विचारत असतात. या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे आता पुढे काय समोर येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. अहवाल पॅाझिटिव्ह शनिवारी मध्यरात्री पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातील खराडी भागातील उच्चभ्रू सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ही पार्टीवर छापा टाकला. यामध्ये ५ पुरुष आणि २ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तीन महिला पळून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. रोहिणी खडसे यांचे पती प्राजंल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांच्या रक्ताच्या तपासणी अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. विद्येच्या माहेरघरात रेव्हीचा पार्टीचा धक्कादायक प्रकार विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात हाऊस अॅाफ पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टीचा धक्कादायक प्रकार समाेर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या रेव्ह पार्टीमुळे पुण्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या वापरामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच रेव्ह पार्टीच्या घटनेमुळे खराडी परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.