Narayan Rane | भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. शिवसेनेसाठी काम केल्यानंतर राणे यांनी २००५ साली शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. याकाळात त्यांनी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी अनेक पदं भूषवले. मात्र आता त्यांनी चिपळूण मधील एका कार्यक्रमात शिवसेना सोडण्यामागचे कारण सांगितले आहे. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना राहिली नाही म्हणून मी शिवसेना सोडून भाजपमध्ये आल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. नेमकं काय म्हणाले नारायण राणे? नारायण राणे म्हणाले, “वयाच्या १५ व्या वर्षापासून सलग ३९ वर्षे मी शिवसेनेसाठी काम केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेसाठी काम केलं. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हाची शिवसेना वेगळी होती. त्यांच्यानंतर शिवसेना राहिली नाही. त्यामुळे मी देखील शिवसेना सोडून भाजपमध्ये आलो आणि आज मी भाजपाकडून याच मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलो आहे.” जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. देशात सत्ता भाजपची आहे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षात भारत जागतिक अर्थव्यवस्थेत 14 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणला आहे. काही वर्षात भारत जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर असेल, असेही नारायण राणे म्हणाले. Narayan Rane | नारायण राणेंचा राजकीय कारकिर्द नारायण राणे यांनी शिवसेनेपासून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास 1968 पासून म्हणजे वयाच्या १५ व्या वर्षीपासून सुरु झाला होता. १९६८ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या चेंबूर येथील शाखेत शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली होती. Narayan Rane | 1990 ते 95 या काळात नारायण राणे पहिल्यांदा विधानसभेवर गेले. 1990 ते 95 दरम्यान नारायण राणे हे विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेतेपद राहिले. 1996 ते 99 युती सरकार आल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्रीपदी विराजमान झाले होते. 1999 मध्ये ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. Narayan Rane | उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद 2005 साली शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद झाले. त्या मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी शिवसेना सोडली. 2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसही सोडली आणि ‘स्वाभिमान पक्ष’ स्थापन केला. दोन वर्षांनी त्यांनी हा पक्ष बरखास्त करून 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. हेही वाचा: Pune District : बावडा-लुमेवाडी गटात चुरस रंगणार; लक्षवेधी लढतीत प्रतिष्ठित नेत्यांची प्रतिष्ठा पणाला