मुंबई :- काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेत काँग्रेस आक्रमक झाली. विधिमंडळाच्या पायऱ्यावर काँग्रेसच्या आमदारांसह विरोधापक्षाच्या सर्व आमदारांनी भाजपा आणि मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देत निषेध नोंदवला. तसेच अनेक काँग्रेस नेत्यासह भाजपाविरोधातील पक्षातील नेत्यांच्या या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
भाजप आणि मोदींनी केलेलं पाप लपविण्यासाठी केलेला सगळा खटाटोप. एवढं घाबरट सरकार आणि पंतप्रधान आजवर जनतेने पाहिला नाही. अशा शब्दात महाराष्ट्र काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.
Rahul Gandhi disqualified : “देशात स्वातंत्र्यानंतर अशाप्रकारे कोणाची…” अजित पवार यांचं भाष्य
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की, हा निर्णय लोकशाही विरोधी आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार केवळ मोदींसाठी काम करत आहे. राहुल गांधी सरकारविरोधात आवाज उठवत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल करुन गुजरातमधील एका न्यायालयातून निर्णय घेत त्यांची खासदारकी रद्द केली आहे. लोकशाही व्यवस्थेचा माध्यमातून केंद्रीय यंत्रणा मागे लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशाची लूट करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांच्याविरोधात आवाज उठवला म्हणून त्यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचं पाप करून जे लोक जनतेचे पैसे घेऊन पळाले त्यांचं समर्थन मोदी सरकार करत आहे. या कारवाईचा आम्ही निषेध करतो.
कॉंग्रेस नेते मा. राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचं पाप करून जे लोक जनतेचे पैसे घेऊन पळाले त्यांचं समर्थन मोदी सरकार करत आहे. या कारवाईचा आम्ही निषेध करतो. pic.twitter.com/5dkDO0FFLR
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 24, 2023
तसेच काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले होते की, “सत्याचा आवाज दडपू पाहणाऱ्या हुकूमशहा विरोधात राहुल गांधी नेहमीच बोलतात आणि पुढेही बोलत राहतील. त्यांच्या याच हिमतीची भीती वाटणारे कधी त्यांच्याविरोधात ED, पोलीस, खटला दाखल करुन त्यांना घाबरवू पाहतात पण अशाने ते घाबरणार नाहीत, हे भाजपने डोक्यात पक्कं बसवून घ्यावं.”