Isha Koppikar : “नागार्जुननं मला तब्बल 14 वेळा थोबाडीत मारलेल्या”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा, नेमकं काय घडलं होतं?

Isha Koppikar : सध्या सिनेमा इंडस्ट्रीतील कलाकारांचे त्यांनी केलेल्या चित्रपटातील शुटिंगचे अनेक किस्से समोर येत आहेत. असाच एक किस्सा प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकरनं हिने सांगितला आहे.
ईशाने अनेक बॅालिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या सौंदर्यांने तरुणांना घायाळ केलं होतं. बराच काळ इंडस्ट्रीपासून अलिप्त असलेल्या या अभिनेत्रीने नुकतेच एका मुलाखतीत साऊथ सुपरस्टार नागार्जुनने एका चित्रपटाच्या सीनवेळी तब्बल १४ वेळा थोबाडीत मारल्या होत्या, त्यानंतर तिच्या गालावर वण उठले होते, असं अभिनेत्रीने सांगितलं आहे. त्यामुळे नेमकं काय घडलं होतं? ते जाणून घेऊयात….
१९९८ मध्ये चंद्रलेखा नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या शुटिंगवेळी नागार्जुनने मला १४ थोबाडीत मारल्या, पण मी कमिटेड एक्ट्रेस आहे, मला अगदी खरीखुरी, मेथड अॅक्टिंग करायची होती. त्यामुळे त्यानं ज्या थोबाडीत मारलेल्या, त्या मला जाणवतच नव्हत्या, असं ईशाने सांगितलं.
चित्रपटाच्या शुटिंगवेळी ईशाने थोबाडीत मारा असं नागार्जुनला सांगितलं. त्यावेळी नागार्जुन तिला म्हणाला की तुला खात्री आहे ना तू काय बोलतेयस? त्यानंतर ईशाने त्याला समजावून सांगितलं की भावना दर्शविण्यासाठी तिला थोबाडीत मारण्याची गरज आहे. ईशा पुढे म्हणाली की, “मला ते जाणवत नाहीये. त्या बिचाऱ्या माणसानं थोबाडीत मारलेल्या, पण अगदी प्रेमानं…” असं तिने सांगितलं.
ईशा हा किस्सा सांगितला म्हणाली की मी खऱ्याखुऱ्या आयुष्यात खूप चिडते, पण कॅमेऱ्यासमोर मला राग येतंच नाही. मला माहित नाही माझा नेमका काय इश्यू आहे, या सगल्या गोंधळात मी तब्बल १४ थोबाडीत खाल्ल्यात…त्यानंतर माझ्या गालावर वण उठलेले… त्या सीननंतर नागार्जुनने माझी माफीही मागितली होती. तो सॅारी म्हणत होता, तर मी त्याला म्हणाले मला अजिबात सॅारी म्हणून नका.





