लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला २२ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी शेवटपर्यंत झुंज दिली, पण संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. जडेजाने शेवटपर्यंत खिंड लढवली, बुमराह १०० मिनिटे मैदानावर टिकून होता, तर सिराजने एक तास किल्ला लढवला. शेवटच्या क्षणांचा थरार भारताला विजयासाठी २२ धावांची गरज असताना इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीर ७५ वे षटक टाकण्यासाठी आला. षटकातील तिसऱ्या चेंडूवर जडेजाने एक धाव घेत स्ट्राइक सिराजला दिली. सिराजने पाचव्या चेंडूवर बचावाचा प्रयत्न केला, पण चेंडूचा वेग आणि हवेतील हालचाल यामुळे तो यष्टींवर आदळला आणि सिराज त्रिफळाचित झाला. सिराजने ३० चेंडूंत ४ धावा केल्या. Some matches stay with you, not for the outcome, but for what they teach. 🙏🏻 🇮🇳 pic.twitter.com/dPObhgQ0XZ — Mohammed Siraj (@mdsirajofficial) July 15, 2025 सिराजची भावनिक पोस्ट पराभवानंतर सिराज स्वतःवर नाराज होता आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू दिसले. सामन्यानंतर त्याने प्रथमच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने सामन्याचे शेवटचे क्षण दाखवणारे फोटो टाकले आणि लिहिले, “काही सामन्यांच्या आठवणी कायम तुमच्यासोबत राहतात. त्या सामन्यांच्या निकालामुळे नव्हे तर त्यातून तुम्ही काय शिकता यासाठी ते सामने तुमच्याबरोबर राहतात.” जडेजा, बुमराह, सिराजची अविस्मरणीय लढत भारताने हा सामना गमावला असला तरी जडेजा, बुमराह आणि सिराज यांची फलंदाजीतली झुंज विसरण्याजोगी नाही. जडेजाने शेवटपर्यंत लढा दिला, बुमराहने १०० मिनिटे खेळपट्टीवर काढली, तर सिराजला चेंडू लागूनही तो पुन्हा फलंदाजीसाठी आला आणि काही चेंडू खेळून काढले. या तिघांच्या प्रयत्नांनी भारतीय चाहत्यांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे.