Modi Government : मोदी सरकारच्या काळात देशावर 151 लाख कोटींचे कर्ज; ‘या’ नेत्याचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
देशाच्या वाढत्या कर्जाच्या मुद्द्यावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला.

Modi Government : देशाच्या वाढत्या कर्जाच्या मुद्द्यावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या १२ वर्षांत (२०१४ ते २०२६) देशावर तब्बल १५१ लाख कोटी रुपयांचे कर्ज लादल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
आंतरराष्ट्रीय अभ्यासासाठी फिनलंड आणि जर्मनीचा दौरा करून परतलेल्या सरकारी शिक्षकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. देशावरील एकूण कर्जाचा बोजा आता २०१ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचा दावा (Modi Government) करत रेवंत रेड्डी म्हणाले की स्वातंत्र्यापासून २०१४ पर्यंत देशाच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी मिळून ५१ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु, २०१४ ते २०२६ या १२ वर्षांच्या काळात एकट्या सध्याच्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात १५१ लाख कोटींचे नवे कर्ज जोडले गेले आहे.
संसदेतील नुकत्याच दिलेल्या एका उत्तराचा दाखला देत त्यांनी सांगितले की, देशावरील कर्जाचा बोजा आता २०१ लाख कोटींवर पोहोचला आहे. पूर्वीच्या पंतप्रधानांनी रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग उभारले, तसेच लाखो गावांना वीज, शिक्षण, सिंचन आणि पिण्याचे पाणी पुरवले. पण मग गेल्या १२ वर्षांत देशात कोणते नवीन विमानतळ, मोठे रेल्वे मार्ग किंवा प्रमुख बंदरे निर्माण झाली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नेहरू-इंदिरा गांधींच्या योगदानाचे समर्थन
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा बचाव करताना रेड्डी म्हणाले की, त्यांनी देशाच्या विकासात अतुलनीय योगदान दिले, तरीही त्यांच्यावर टीका केली जाते. काँग्रेसच्या काळात चीन आणि पाकिस्तानचा युद्धात पराभव झाला आणि पाकिस्तानचे विभाजन करून बांगलादेशची निर्मिती झाली.
रेवंत रेड्डी यांनी (Modi Government) शिक्षक आणि त्यांच्या संघटनांना पुढील ५ वर्षांत राज्यातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले. याचवेळी त्यांनी ठामपणे सांगितले की, ते २०३४ पर्यंत तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदावर राहतील.






