Mirza Fakhrul Islam Alamgir : भारताबरोबरचे प्रलंबित मुद्दे चर्चेद्वारे त्वरित सोडवावेत; बांगलादेशच्या अध्यक्षांनी व्यक्त केली अपेक्षा
भारताबरोबरचे प्रलंबित मुद्दे चर्चेद्वारे त्वरित सोडवण्यात यावेत, अशी अपेक्षा बांगलादेशचे अध्यक्ष मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर (Mirza Fakhrul Islam Alamgir) यांनी व्यक्त केली आहे.

Mirza Fakhrul Islam Alamgir : भारताबरोबरचे प्रलंबित मुद्दे चर्चेद्वारे त्वरित सोडवण्यात यावेत, अशी अपेक्षा बांगलादेशचे अध्यक्ष मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर (Mirza Fakhrul Islam Alamgir) यांनी व्यक्त केली आहे. भारताबरोबरचे द्विपक्षीय संबंध सक्षम करण्याला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
बांगलादेशमधील भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिपाठी यांनी आलमगीर यांची भेट घेतली असता आलमगीर यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. आलमगीर (Mirza Fakhrul Islam Alamgir) हे बांगलादेशातील सत्तारुढ बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सर्वाधिक काळ सरचिटणीस राहिले असून देशाचे २३ वे अध्यक्ष म्हणून त्यांनी २१ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला आहे. त्रिवेदी हे त्यांना भेटणारे आणि त्यांचे अभिनंदन करणारे पहिले विदेशी राजदूत आहेत.
त्रिवेदी आणि आलमगीर यांच्यातील भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंध, सांस्कृतिक संबंध आणि दोन्ही देशांच्या जनतेतील थेट संपर्काच्या मुद्द्याबाबत चर्चा झाली. परस्पर हिताच्या क्षेत्रातील भागीदारी आणि सार्वभौमत्वाच्या महत्वावर दोन्ही नेत्यांनी विशेष भर दिला.
गंगा आणि तीस्ता या सामायिक नद्यांच्या योग्य वाटपाला भारताने जपले असल्याचेही आलमगीर (Mirza Fakhrul Islam Alamgir) यांनी यावेळी नमूद केले. नंतर, त्रिवेदी यांनी जहाजबांधणी, रेल्वे, रस्ते वाहतूक आणि पूल मंत्री शेख रबीउल आलम यांची भेट घेतली. रस्ते, महामार्ग आणि रेल्वे राज्यमंत्री हबीबुर रशीद हेही यावेळी उपस्थित होते.






