Maulana Tauqeer Raza Statement । इत्तेहादे मिल्लत कौन्सिलचे (आयएमसी) अध्यक्ष आणि इस्लामिक धर्मगुरू मौलाना तौकीर रझा त्यांच्या भडक विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मौलान तौकीर रझा यांनी जयपूरमधील मुस्लिमांना एकत्र येऊन दिल्लीला घेराव घालण्याचे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी, “ज्या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरू, त्यादिवशी तुमचा आत्मा थरथरेल. काही झाले तर त्याची जबाबदारी त्यांचीच असेल.” असे त्यांनी म्हटले आहे. तौकीर रझा यांनी यावेळी, ‘सरकार नेहमीच अप्रामाणिक होते पण आज ते सर्वात बेईमान आहे. तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवा पण तुमच्याच मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या गायीच्या चरबीकडे बघू नका. आमची संपत्ती ताब्यात घेण्याचा अधिकार कोणाच्याही बापाला नाही, असेही ते म्हणाले. तुम्ही आमचा नंबर लपवा, ज्या दिवशी आम्ही रस्त्यावर येऊ तेव्हा तुमचे आत्मे थरथर कापतील, असा धमकीवजा इशारा दिला आहे. दिल्लीला वेढा घालण्यासाठी बोलवा Maulana Tauqeer Raza Statement । मौलाना म्हणाले की, आम्ही आधी तिरंगा आणू, जर ते मान्य झाले नाहीत तर त्यानंतर जे काही होईल त्याची जबाबदारी त्यांचीच असेल. आमचे तरुण डरपोक नाहीत. आम्ही आमच्या तरुणांवर नियंत्रण ठेवले आहे, ज्या दिवशी ते नियंत्रणाबाहेर जातील तेव्हा त्यांना रोखणे तुमच्या हातात नाही. संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे, तुम्ही जर लक्ष दिले तर. तुमची ताकद दाखवायची असेल तर. याबाबत कायदा करावा लागेल. तुमचा मुद्दा मांडायचा असेल तर तुम्हाला दिल्लीत यावे लागेल. कुराण आणि अल्लाहचा अपमान करणारे सरकार बेईमान Maulana Tauqeer Raza Statement । तौकीर रझा म्हणाले की, अल्लाहचा गैरवापर होत असल्याने तो खूप नाराज आहे. कुराण आणि अल्लाहचा अपमान करणारे सरकार बेईमान आहे. जर तुम्हाला यामुळे वेदना होत असतील आणि तुम्ही प्रामाणिक असाल तर मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही दिल्लीत या, आमची संपत्ती ताब्यात घेण्याचा अधिकार कोणातही नाही. मौलाना तौकीर रझा अनेकदा त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. याआधीही त्यांनी पैगंबरांच्या सन्मानाचा अवमान झाल्यास यावेळी निषेध निदर्शने किंवा निवेदन दिले जाणार नसून देश चकमक करण्यात येईल, अशी घोषणा केली होती.