भाजपकडे मंत्रिपदाच्या मागणीवर मनीषा कायंदे यांचे सूचक वक्तव्य ; म्हणाल्या ,”आम्ही तो विषय…”

Manisha Kayande on Eknath Shinde । महाराष्ट्रात नवीन महायुती सरकार स्थापनेची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या नावांची चर्चा जोरात सुरू आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या मागण्या मांडत आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या पक्षाकडे 12 मंत्रिमंडळ पदांची मागणी केली आहे. त्यावर आता शिंदे गटनेत्या मनीषा कायंदे यांचे वक्तव्य आले आहे.
अमित शहा यांच्या सोबत काय चर्चा अद्याप समोर नाही Manisha Kayande on Eknath Shinde ।
शिवसेनेला महायुतीत कोणती जबाबदारी हवी आहे, असे विचारले असता, मनीषा कायंदे म्हणाल्या, “माध्यमातून आलेल्या वृत्तांतून या सर्व बाबी समोर आल्या आहेत. याबाबत काय चर्चा सुरू आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच,”मला कोणताही अडथळा निर्माण करायचा नाही आणि मला कोणाचा अडथळा बनवायचा नाही.” असे म्हणत मुख्यमंत्रपदाचा दावा सोडला असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले.
‘एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान मोदींवर विश्वास’ Manisha Kayande on Eknath Shinde ।
मनीषा कायंदे यांनी पुढे बोलताना, “एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. कारण एकनाथ शिंदे हे एनडीएचा एक महत्त्वाचा भाग असून महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांनी त्यांना आपला नेता म्हणून निवडले आहे. कोणताही पक्ष असो. पक्षाच्या वतीने बोलायचे की किती पदे मागायची, हे आम्ही त्यांच्यावरच सोडले आहे.” असे म्हणत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे मुख्यमंत्रीपदाची मोठी मागणी ठेवली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी अमित शहा यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारायची असल्याचे सांगितले आहे. याशिवाय त्यांनी आपल्या आमदारांसाठी 12 मंत्रालयांची मागणी केली आहे.





