Makrand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अभिनेत्यानं केलं होत मोठं भाष्य; नेमकं काय घडलं होत? वाचा सविस्तर….

Uddhav Thackeray | Makrand Anaspure | Raj Thackeray : राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु आहेत. आदित्य आणि राज ठाकरे यांनीदेखील याबद्दल सकारात्मक विधाने केली आहेत. उद्धव आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन होणार का? याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याला आहे.
‘आमच्या मतभेदांपेक्षा, वादापेक्षा महाराष्ट्र मोठा नाही’, असं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यावर आमच्यात वाद, भांडणं नव्हतीच. जर असलीच, तर ती आज संपली, असं म्हणत उद्धव यांनी राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत आयोजित केली होती.
यानंतर शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या मनोमिलनच्या चर्चेनं जोर धरला. त्यातच आजच्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामुळे त्यामुळे दोन बंधूंमधील दुरावा मिटण्याची शक्यता वाढली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या मनात जे आहे, माझ्या मनात, शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या मनात कोणताच संभ्रम नाही. त्यामुळे मी आता संदेश देणार नाही, बातमीच देईन’, असे म्हणत सुचक वक्तव्य केले.
मकरंद अनासपुरे काय म्हणाले होते? एकदा पाहाच….
दरम्यान, मराठी अभिनेते ‘मकरंद अनासपुरे’ यांनी गेल्या वर्षीच ‘राज-उद्धव’ यांच्या एकत्र येण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. ते पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मकरंद अनासपुरेंचा ‘राजकारण गेलं मिशीत’ हा सिनेमा गेल्यावर्षी आला होता. तेव्हा त्यांनी एका प्रसिद्धीवृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं होतं.
ते म्हणालेले की, “मराठी माणूस म्हणून मला केव्हाही आनंद होईल. मी एकदा राज ठाकरेंची मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांना विचारलं होतं की भावाची कधी आठवण येत नाही का त्रास होत नाही का. मला वाटतं की मराठी माणसांना एकत्र पाहिलं तर आपणही आनंदितच होऊ. माझीही हीच भावना असेल.” असं ते म्हणाले होते.





