महाराष्ट्रातील ‘या’ 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ; यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather। महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. अशा स्थितीत येथील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. याशिवाय धरणातील पाणीसाठाही वाढला आहे. दरम्यान, हवामान खात्याने आज काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी Maharashtra Weather।
हवामान खात्याने आज राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये कोकणातील रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याचवेळी पुणे शहरी भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी त्यापूर्वीच येथे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न आता सुटला आहे.
पुण्याची ही धरणे पूर्ण भरली Maharashtra Weather।
पुणे- पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ७.९७ टीएमसी (९३.६४ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील इतर धरणांपैकी कलमोडी, आंध्रा, भाटघर आणि उजनी ही धरणे 100 टक्के भरली असून या धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. याशिवाय पेडगाव, डिंबे, चासकमान, भामा आसखेड, वाडीवळे, कासारसाई, गुंजवणी, नीरा देवघर, वीर ही धरणेही काठोकाठ भरल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे भरली आहेत. अशा स्थितीत मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता संपली आहे. अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झालेल्या चार धरणांमध्ये तानसा धरण, मोडकसागर धरण, भातसा धरण आणि वैतरणा धरणांचा समावेश आहे.
हेही वाचा
आमदारांचं टेन्शन वाढलं ; देवेंद्र फडणवीस म्हणाले,” जिंकून येणाऱ्यालाच…”





