Maharashtra Rain : राज्यात पुढील 4 दिवस महत्वाचे; ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार, सरकारकडून सतर्कतेचा इशारा

Weather Update । India Monsoon । भारतात २०२५ च्या मान्सूनने या वर्षी असामान्य वेग दाखवला आहे. साधारणपणे १ जून रोजी मान्सून केरळमध्ये प्रवेश करतो, परंतु यावेळी तो ८ दिवस आधी म्हणजे २४ मे रोजी आला आहे.
इतकेच नाही तर ३५ वर्षांत पहिल्यांदाच महाराष्ट्रात मान्सून इतक्या लवकर दाखल झाला आहे. मान्सून आतापर्यंत केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, बंगालचा उपसागर, मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात पोहोचला आहे.
गोवा, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील उर्वरित राज्यांमध्ये मान्सून लवकरच दाखल होईल. आयएमडीच्या मते, मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. दरम्यान, हवामान खात्याने देशाच्या विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीनुसार, पुढील काही तासांत केरळ, मुंबई, किनारी महाराष्ट्र, दक्षिण झारखंड, उत्तर उत्तर प्रदेश आणि मेघालयात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
असे असतानाच आता पुण्यातील हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी आगामी काही दिवसांत मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात शेतकऱ्यांनी तसेच चाकरमान्यांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे. मुंबई, रत्नागिरी यांच्यासह राज्याच्या इतरही जिल्ह्यांत पाऊस झाला आहे.
यात अहिल्यानगर, सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांतही पाऊस झाला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांत अगोदरच पाऊस झाला आहे. येणाऱ्या चार ते पाच दिवसांत कोकणात चांगल्या पवसाची शक्यता आहे, असं भाकितही या अधिकाऱ्यांनी व्यक्तं केलं.
सोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्हा तसेच घाटमाथ्यावरही येणाऱ्या चार ते पाच दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांतही यलो अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत हलक्या ते मध्य स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
सुरक्षिततेचा सल्ला….
भारतीय हवामान खात्याने मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा आल्यास लोकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. किनारी भागात आणि किनारी भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विद्युत उपकरणांपासून अंतर ठेवा आणि मोकळ्या जागेत मोबाईल वापरू नका. असं देखील सांगण्यात आलं आहे.





