Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा राजकीय भूकंप; ठाकरेंचे ६ खासदार दिल्लीत दाखल
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जी राजकीय उलथापालथ सुरू आहे, ती पाहता सर्वसामान्यांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चांना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत. (Maharashtra Politics)
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील तब्बल ६ खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असून, त्यानंतर हा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)
दिल्लीत वाढल्या हालचाली
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे एकूण ९ खासदार आहेत. त्यापैकी ६ खासदार वेगळा गट तयार करण्याबाबत चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील संभाव्य फूट रोखण्यासाठी वरिष्ठ नेते संजय राऊत आणि अनिल देसाई हे दिल्लीत दाखल झाले आहेत. (Maharashtra Politics)
समोर आलेल्या माहितीनुसार परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, घाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब बाकचौरे, खासदार राजाभाऊ वाजे हे सर्वजण सध्या दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)
यातील काही खासदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हेही दिल्लीला रवाना झाल्याचे समोर आले आहे, त्यामुळे रात्रीत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)
स्थापना दिनापूर्वी मोठी घडामोड?
येत्या १९ जून रोजी शिवसेना पक्षाचा स्थापना दिन आहे. त्यापूर्वीच नाराज खासदारांकडून स्वतंत्र गटाची घोषणा होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संभाव्य गटाकडून पुढे शिंदे गटात विलिनीकरणाचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो, अशीही माहिती समोर येत आहे. (Maharashtra Politics)
ठाकरे गटाचा दावा कायम
दरम्यान, या सर्व चर्चांवर ठाकरे गटाकडून सावध भूमिका घेण्यात आली आहे. पक्षातील सर्व खासदार आमच्यासोबतच असून कोणतीही फूट पडणार नाही, असा दावा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येत आहे. (Maharashtra Politics)
‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेत
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून कथितपणे राबवण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे गटातील आमदार आणि खासदारांशी संपर्क असल्याच्या दाव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, अद्याप कोणत्याही खासदाराने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. (Maharashtra Politics)
त्यामुळे पुढील काही दिवसांत दिल्ली आणि मुंबईतील राजकीय हालचालींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, ठाकरे गटाला खरोखरच मोठा धक्का बसणार की या चर्चा केवळ राजकीय अफवा ठरणार, याचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)






