ठाण्यातील बैठकीत शिवसेनेला नगरविकाससह मिळणार 13 मंत्रीपदं? ; देवेंद्र फडणवीसांनी बैठकीला लावली फोनद्वारे हजेरी

Maharashtra Cabinet Expansion । राज्यातील महायुती सरकारच्या शपथविधीनंतर आत सगळ्यांच लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील काही मंत्रिपदांच्या तिढ्यामुळे हा विस्तार थांबला होता. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीअंती शिवसेनेला नगरविकास खाते मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन वरून एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला असल्याचे म्हटले जात आहे.
शिवसेनेला नगरविकाससह मिळणार 12 मंत्रीपदं Maharashtra Cabinet Expansion ।
ठाण्यातील या बैठकीनंतर शिवसेनेला 12 मंत्रीपदं आणि उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदांसाठी बरेच दिवस भाजपला ताटकळत ठेवले होते. त्याचाच फायदा म्हणून शिंदे गटाच्या वाट्याला 13 ते 14 मंत्रीपदं येणार असल्याची माहिती आहे. जास्त मंत्रीपदं घेऊन एकनाथ शिंदे यांनी योग्य तो संदेश सर्वांना दिला आहे. आता शिवसेनेसोबत चर्चा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजप-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळासंदर्भातील एक सविस्तर चर्चा दिल्लीत देखील होणार असल्याचे म्हटले जात आहे. 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त जवळपास निश्चित मानला जात आहे. दरम्यान,या विस्तारात अब्दुल सत्तारांच्या नावाला भाजप आमदारांसह शिवसेना आमदारांचाही विरोध असल्याचे समोर आले आहे.
भाजपचे आमदारही संभ्रमात Maharashtra Cabinet Expansion ।
एकीकडे शिवसेनेचे मंत्री टेन्शनमध्ये असताना दुसरीकडे भाजपच्या आमदारही संभ्रमात असल्याचे दिसत आहे. दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. काही खात्यांबाबत महायुतीत समन्वय होत नसल्याने भाजपचीही यादी थांबल्याचे म्हटले जात आहे. दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती. पुढच्या 48 तासात तरी दिल्लीत काही हालचाली घडणार की, आणखी वेळ लागणार याकडे संभाव्य मंत्र्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याने भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांचीही धाकधूक वाढली आहे.





