Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (६ मार्च) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री स्वतः अर्थसंकल्प मांडत असल्याची नोंद यावेळी झाली. अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. अर्थसंकल्पाच्या तयारीत अजित पवार यांचा मोठा सहभाग असल्याचे सांगत हा अर्थसंकल्प त्यांना समर्पित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Maharashtra Budget 2026 या अर्थसंकल्पात शेतकरी आणि शेती क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर करण्यात आल्या. राज्यातील १० ते १५ ठिकाणी एकत्रित मूल्य साखळी उभारण्याचा सरकारचा मानस आहे. यामुळे शेतमालाला योग्य दर मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधन व मार्गदर्शन (Maharashtra Budget 2026) तसेच ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव आणि शेतीसंबंधित माहिती डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून दिली जात असल्याचे सरकारने सांगितले. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधन व मार्गदर्शन सुरू असून यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला. याशिवाय ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेअंतर्गत राज्यातील १ कोटी ३१ लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी फेब्रुवारीपर्यंत तयार करण्यात आल्याची माहितीही अर्थसंकल्पात देण्यात आली. विशेष योजना सुरू (Maharashtra Budget 2026) याशिवाय पुढील चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. महिला गोपालक आणि शेळीपालकांसाठीही विशेष योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र बनवणार तसेच राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राचे सकल उत्पादन १२३ अब्ज डॉलरवरून १५०० अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यासोबतच महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र (Global Manufacturing Hub) बनवण्याचा संकल्पही अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला.