राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याजवळील जमीन खचली; रोहित पवारांनी साधला सरकारवर निशाणा

Malvan Rajkot Fort | मालवणमधील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळील बाजूची काही माती खचली असल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या महिन्यातच राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यात आला होता. या पुतळ्याला अभिवादन करून विधीवत पूजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते. Malvan Rajkot Fort |
रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूचा काही भाग खचल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तातडीने दुरुस्ती हाती घेतली. रात्री उशिरापर्यंत खचलेल्या भागात भराव टाकून सिमेंटने सर्व भाग बुजवण्यात आला आहे. मात्र आता पुन्हा एकदा कामाच्या दर्जाबद्दल अनेक सवाल उपस्थित राहिले आहे. यावर आता ट्वीट करत रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. Malvan Rajkot Fort |
रोहित पवार यांचे ट्वीट
“निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळं मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता आणि आता नव्याने उभारलेल्या पुतळ्याला शंभर वर्षे काहीही होणार नाही असा दावा सरकारने केला असताना पुतळ्याच्या अनावरणाला शंभर दिवसही झाले नसताना पुतळ्याच्या चबुतऱ्याचा भराव खचला. यावरुन हे सरकार महापुरुषांचे पुतळे विचारांचा आदर्श आणि प्रेरणा म्हणून उभारतंय की केवळ ठेकेदारांसाठी, असा प्रश्न पडतो. विचारांनाच खोली नसेल तर अशा सरकारकडून पुतळ्याच्या भक्कम पायाची अपेक्षा कशी करणार?,” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
“आता यावर तात्पुरती डागडुजी केली जाईल पण महिन्याभरात भराव कसा खचला याचं उत्तर सरकारने द्यावं. भराव खचल्याचा अर्थ हे कामसुद्धा निकृष्ट दर्जाचं आहे, हे दिसतं आणि शिवप्रेमी म्हणून आम्ही हे कदापी खपवून घेणार नाही, सरकारने याची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी,” अशी मागणी यावेळी रोहित पवार यांनी केली आहे. Malvan Rajkot Fort |
पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले होते शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन
दरम्यान, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये केले होते. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच हा पुतळा पडण्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर राज्यात याचे पडसाद उमटले होते. त्यानंतर नवीन पुतळा उभारला, मात्र अवघ्या काही काळातच चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याने बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. Malvan Rajkot Fort |
हेही वाचा:
राज्यात पावसाचा हाहाकार, वीज पडून 9 जणांचा मृत्यू, 7 जखमी, जनजीवन विस्कळीत





