Khawaja Asif : पाकिस्तानविरोधात पुन्हा संघर्ष केल्यास भारताला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल; पाकच्या संरक्षण मंत्र्यांनी दिला इशारा

इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानविरोधात पुन्हा संघर्ष केल्यास भारताला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, अशा शब्दात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिला आहे. पाकिस्तानने काही आगळीक केल्यास त्याला भारताकडून प्रत्युत्तर दिले जाईल, असे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अलिकडेच म्हटले होते. त्याला उत्तर देताना ख्वाजा आसिफ यांनी भारताला इशारा दिला आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या माऱ्यात अमेरिकेच्या बनावटीच्या एफ-१६ विमानासह पाकिस्तानची डझनभर लढाऊ विमाने नष्ट झाली होती, असे हवाई दल प्रमुख एपी सिंह शुक्रवारी म्हणाले होते. मे महिन्यात भारतीय लष्कराने केलेल्या माऱ्यामुळे होणारे नुकसान थांबवण्यासाठी पाकिस्ताननेच संघर्ष थांबवण्याची विनंती केली होती. मात्र गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू केले जाईल, हे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे.
मात्र तरीही पाक संरक्षण मंत्र्यांनी भारताला प्रत्युत्तर देण्याची भाषा वापरली आहे. भारताच्या राजकीय आणि लष्करी नेत्यांची वक्तव्ये म्हणजे गमावलेली विश्वासार्हता पुन्हा मिळवण्याचा एक अपयशी प्यत्न असल्याचे आसिफ यांनी म्हटले आहे. मे महिल्यात ०-६ अशा फरकाने अपयश आल्यानंतर निर्माण झालेल्या दबावानंतर अशी वक्तव्ये केली गेल्याचे ते म्हणाले. मात्र ०-६ अशा फरकाने भारताचा पराभव झाला, म्हणजे काय हे त्यांनी स्पष्ट केले नाही.





