“कपडे काढले, गळ्यात पट्टा बांधून फिरवलं…”टार्गेट पूर्ण न केल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली अमानवीय शिक्षा ; पहा व्हिडिओ

Kerala viral video । केरळमधील कोची येथील एका मार्केटिंग कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना अतिशय क्रूर वागणूक दिली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांचे टार्गेट पूर्ण करण्याच्या नावाखाली त्यांच्यासोबत अमानवीय पद्धतींचा अवलंब केल्याचे समोर आले आहेत. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हयरल झाला असून त्यात जे कर्मचारी त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यात अयशस्वी झाले आहेत त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचे दिसून येत आहे. आता यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
टार्गेट पूर्ण न केल्याबद्दल शिक्षा Kerala viral video ।
टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना माणुसकीच्या मर्यादा ओलांडणारी कामे करण्यास भाग पाडल्याचे व्हिडिओतून दिसून येत आहे. अहवालांनुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या गळ्यात श्वानाचा पट्टा बांधून रांगण्यास भाग पाडण्यात आले. त्यांना श्वानासारखे वाटीतून पाणी पिण्यास सांगितले गेले आणि जमिनीवर फटफटले गेले. याशिवाय, त्यांना खोलीच्या कोपऱ्यात श्वानासारखे लघुशंका देखील करण्यास भाग पाडले. कंपनीतील कर्मचारी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कर्मचाऱ्यांचे कपडे काढण्यास आणि अश्लील कृत्य करण्यास, चावलेले आणि थुंकलेले फळ चाटण्यास, तोंडात मीठ ठेवण्यास आणि जमिनीवर रांगत नाणी चाटण्यास भाग पाडले आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हयरल झाले असून हे सर्व पाहून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महिलांवर अत्याचार झाले Kerala viral video ।
एका माजी कर्मचाऱ्याने माध्यमांना सांगितले की, कंपनीचे कामगार त्यांच्या बॉसविरुद्ध बोलण्यास खूप घाबरत होते. त्याला दरमहा ६००० ते ८००० रुपये पगार मिळत असे. कंपनीने कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि जास्त पगार देण्याचे आश्वासन देऊन त्यांना गुलाम केले, परंतु प्रत्यक्षात त्यांचे शोषण केले. अहवालानुसार, ज्या तरुणींनी पूर्वी कंपनीत काम केले होते आणि घरोघरी उत्पादने विकली होती त्यांनी हुबैलविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनी आरोप केला की हुबैल रात्री वैयक्तिक मूल्यांकनाच्या बहाण्याने त्यांच्या घरी येत असे आणि त्यांच्याशी गैरवर्तन करत असे. हे प्रकरण आता समोर आल्याने त्याची चौकशी केली जात आहे. यावर कडक कारवाई करण्याची मागणी लोक करत आहेत.
A video has surfaced which shows underperforming employees of a private marketing firm in Kerala’s Kochi being subjected to inhuman treatment, including making them walk on their knees like chained dogs for not meeting their targets. #Kerela #Kochi #MarketingFirm pic.twitter.com/z7QpZiXU7s
— Priyathosh Agnihamsa (@priyathosh6447) April 6, 2025
अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, राज्याचे कामगार मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी अहवाल मागितल्यानंतर एर्नाकुलम कामगार विभागाने व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. ते म्हणाले, “केरळ हे कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी करणारे राज्य आहे. कोणत्याही प्रकारच्या कामगार छळाला परवानगी दिली जाणार नाही. एर्नाकुलम कामगार अधिकाऱ्यांना घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. केरळ राज्य युवा आयोगाने स्वतःहून कारवाई सुरू केली आहे आणि व्हिडिओमध्ये कामगारांच्या क्रूर शोषणाबाबत जिल्हा पोलिस प्रमुखांकडून अहवाल मागितला आहे.”
कंपनीकडून कर्मचाऱ्यांचे पगार रोखले
तसेच कंपनीवर असे आरोप आहेत की त्याठिकाणी कर्मचाऱ्यांना खूप वाईट वागणूक दिली जाते. पहिल्या ६ महिन्यांत कर्मचाऱ्यांचा छळ कमी झाल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला, जर कर्मचाऱ्यांना त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यात अपयश आले तर त्यांना वाट पाहण्यास सांगितले जाते आणि ६ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्यांना व्यवस्थापक बनवण्याचे आश्वासन दिले जाते. पण प्रत्यक्षात असे घडत नाही. कर्मचाऱ्यांना शोषणाचा सामना करावा लागत असला तरी, त्यांचे पगार रोखले गेल्याने ते नोकरी सोडू शकत नाहीत.” असा कंपनीचा हेतू असायचा असेही सांगण्यात येत आहे.




