“विरोधक रोजच लोकशाहीची थट्टा….” ; कंगना राणावत यांनी विरोधकांवर निशाणा साधला, ‘संविधाना’चाही केला उल्लेख

Kangana Ranaut on Opposition। बिहारमध्ये मतदार यादी पडताळणीवरून सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार कंगना राणावत यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. यावेळी कंगना राणावत यांनी SIR वर भाष्य केले आहे. त्याविषयी बोलताना त्यांनी,”विरोधी पक्ष फक्त गोंधळ घालतात, त्यांना देशाची किंवा लोकशाहीची पर्वा नाही.” असे म्हणत विरोधकांवर आरोप केला. तसेच सभागृहात विरोधकांच्या निषेधाबाबत बोलताना कंगना यांनी, “हे लोक दररोज सभागृहाची प्रतिष्ठा दुखावत आहेत, लोकशाहीची थट्टा करत आहेत आणि संविधानाचा गळा दाबत आहेत.” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
हिमाचलपासून दिल्लीपर्यंत बिहारचा मुद्दा गाजतोय Kangana Ranaut on Opposition।
हिमाचल प्रदेशातील मंडी येथील आमदार आणि आता दिल्लीच्या खासदार असलेल्या कंगना राणावत यांनी बिहारच्या एसआयआरवर आपले मत व्यक्त केले. विरोधी पक्षांच्या निषेधांवर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी, “देश त्यांच्या वृत्तीवर लक्ष ठेवून आहे.” असे म्हटले. तसेच “दररोज हे लोक वेलमध्ये जातात, सभागृहाचे कामकाज रद्द केले जात आहे. ही लोकशाही आहे का? विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही, म्हणूनच ते आवाज करत आहेत.”असेही म्हटले.
#WATCH | Delhi: BJP MP Kangana Ranaut says, “An opposition has certain responsibilities. The country is seeing their behaviour in Parliament. They strangle democracy and the constitution by creating unnecessary ruckus in the House. They enter the well everyday. Ministers come… pic.twitter.com/PEHRkP6YAJ
— ANI (@ANI) July 24, 2025
काय आहे SIR ? आणि का सुरु आहे गोंधळ ?
बिहारमध्ये २०२५ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, मुख्य निवडणूक आयोगाने विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेचा उद्देश राज्यातील मतदार यादी अद्ययावत करणे आहे जेणेकरून सर्व पात्र मतदारांचा समावेश होईल आणि डुप्लिकेट, मृत किंवा स्थलांतरित व्यक्तींची नावे काढून टाकली जातील. ही प्रक्रिया २४ जून २०२५ रोजी सुरू झाली. प्रारूप यादी १ ऑगस्ट रोजी येईल. अंतिम मतदार यादी ३० सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होईल.
विरोधकांचा निषेध आणि भाजपचा बचाव Kangana Ranaut on Opposition।
या पडताळणी प्रक्रियेबाबत बिहार विधानसभेत मोठा गोंधळ सुरू आहे. या माध्यमातून काही विशिष्ट वर्गांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांचा आहे. तर भाजप याला लोकशाही सुधारणांच्या दिशेने एक आवश्यक पाऊल म्हणत आहे. कंगना राणौत सारख्या नेत्यांच्या विधानांकडे या संदर्भात पाहिले जात आहे, ज्यावरून असे दिसून येते की भाजप आता राष्ट्रीय पातळीवरही या मुद्द्यावर विरोधकांना कोंडीत पकडण्याची रणनीती अवलंबत आहे.





